
घटना अशी की ओम मुंडफणे यांस मंबई येथिल आपल्या मामा कडे जायचे होते . परंतु घरचे परवानगी देणार नाहीत म्हणून त्याने तडक पुणे गाठले व शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून दिल्लीला जाणाऱ्या गाडीत तो बसला परंतु रेल्वेमध्ये त्याला झोप लागल्याने मुंबई येऊन गेल्याचे त्याला कळले नाही तो थेट दिल्लीला गेला . तिथे उतरल्यावर त्याने मी कुठे आलो असे एकाला विचारले त्याने तू दिल्लीला आला आहेस तुला कोठे जायचे आहे असे विचारल्यावर त्याने मुंबईला उतरायचे होते असे सांगितले . त्यावर त्या इसमाने पुन्हा मुंबईचे तिकीट काढण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्याने तिकीट काढले व रात्रभर तिथेच थांबला दरम्यान एक इसम त्याच्याजवळ आला व त्याला तू ओम रेडे का असे विचारले घाबरलेल्या ओम ने हो म्हणत आपण कसे मला ओळखले असे म्हणताच त्या इसमाने त्यास व्हिडीओ कॉल करून त्याचे मामाशी बोलणे करून दिले . त्यानंतर त्या मामाच्या मित्राने ओमला विमानाचे तिकीट काढून दिले . व ओम घरी परतला . एकूणच या खळबळ जनक नाट्याचा असा शेवट झाला .




















