बार्शी – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, धाराशिवचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी व जीवनोपयोगी मार्गदर्शन केले.
अमोल ताकभाते यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये धाराशिव जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जीवनातील संघर्ष, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर सातत्याने प्रयत्न करुन मिळवलेले यश याबद्दल मनमोकळेपणाने अनुभव कथन केले. जीवनात यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून सातत्य, वेळेचे नियोजन, नियमित सराव आणि योग्य संगत अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
“्आ््आ्आ्् आपल्यातील कमकुवत गुण हे जन्मतः कायमस्वरुपी नसतात; योग्य सराव, प्रयत्न आणि सातत्याच्या बळावर आपण आपल्या कमतरतांचे रुपांतर कौशल्यात करू शकतो, असा सकारात्मक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात बौद्धिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्याही सक्षम आणि तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. आपल्या जीवनातील अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत MPSC, ध्येय निश्चिती, वेळेचा योग्य वापर, सातत्यपूर्ण अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबतही मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
याप्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा सौ. वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 14