भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत खिचड़ी घोटाळा प्रकरणातील खिचड़ी चोराचे नाव समोर आणले आहे. मविआ सरकारच्या काळात ठाकरे गटातील नेत्यांनी कोविड काळात मोठा घोटाळा व भ्रष्टाचार केला असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच ह्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपण पोलिसांनी दिले असून, लवकरच यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले.
बँक खात्याबद्दल पुरावे दाखवताना ते म्हणाले, “विदीता संजय राऊत या संजय राऊतांच्या सुपुत्री आहेत. त्यांच्या खात्यात खिचडीचे पैसे गेलेत. एक किंवा दोन वेळा नाही तर अनेकवेळा गेलेत. सह्याद्री रिफ्रेशमेंटला यामध्ये सव्वा आठ कोटी मिळाले आहेत. १० कोटी ३७ लाख पैकी २ कोटी ज्यांचा खिचडीशी संबंधदेखील नाही, अशा लोकांच्या अकाऊंटमध्ये गेले आहेत. आणि विदीता संजय राऊतच्या खात्यात २९ मे २०२० रोजी ३ कोटी ५० लाख रु. आले आहेत. २६ जुन २०२० रोजी ५ लाख रु. आले. ४ ऑगस्ट २०२० ला १ लाख २५ हजार आले. २० ऑगस्ट २०२० रोजी ३ लाख रु. आले.”
“विदीता संजय राऊत, महापालिकेने खिचडीचे पैसे सह्याद्री रिफ्रेशमेंटला दिले. ३० एप्रिल २०२० रोजी ६४ लाख ४ हजार ९३७ दिले. तर, २ मे २०२०ला ज्यांचा काही संबंध नाही, अशा कंपनीत गेले. आणि तिथुन सुरज चव्हाणांना. पहिलं पेमेंट हे ६४ लाख ४ हजार १३७ त्यातून ४५ लाख आरटीजीएस ला देण्यात आलं. दुसरे महापालिकेकडुन आलेले पेमेंट ३ मे २०२० ला २४ लाख ९० हजार. हे सर्व सह्याद्रीच्या खात्यात गेलं.”
“संदीप राजाराम राऊत जे आप्पा म्हणुन ओळखले जातात. हे संजय राऊतांचे भाऊ आहेत. या आप्पांच्या खात्यात १० ऑगस्ट २०२० ला ५ लाख रु. गेले. २० ऑगस्ट २०२० ला १ लाख ४५ हजार गेलेत. ५० खिचडी कॉन्ट्रॅक्टर आहेत. कोणाला ८ कोटी, कोणाला १० कोटी गेले आहेत. आयकर विभाग, ईडीने या खात्यांची चौकशी केली आहे” असा खुलासा किरीट सोमय्यांनी केला आहे