Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“चांगले काम कराआणि विसरून जा”- नितीन गडकरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 27, 2024
in india
0
“चांगले काम कराआणि विसरून जा”- नितीन गडकरी

????????????????????????????????????????????????????????

0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चांगले काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास न्यावे. परंतु, काम पुर्ण झाल्यावर “मी केले..मी केले” असा अभिमान न बाळगता ते विसरून जावे असे अनोखे तत्त्वज्ञान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीसाठई नामांकन अर्ज सादर करण्यापूर्वी गडकरींनी हिंदुस्थान समाचारशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपली सुस्पष्ट मते मांडलीत.

दिल्लीच्या राजकारणात येण्यापूर्वी गडकरी 2009 ते 2013 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. यापूर्वी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. गडकरींनी केलेली विकास कामे मैलाचा दगड मानली जातात. परंतु, गडकरी कधीच कौतुकाने हुरळून जात नाहीत. लोक पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांच्या मागे धावण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. माणसाचा स्वभाव आणि काम हीच त्याची खरी ओळख असते असे गडकरी यांनी सांगितले. मंत्री म्हणून हाती घेतलेले विकास कार्य अपूर्ण ठेवत नाही आणि काम पूर्ण झाल्यावर विसरून जातो असे गडकरी म्हणाले. गडकरींच्या मते, नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे ही जनता आणि माध्यमांची जबाबदारी आहे. त्यामुळे अमुक गोष्ट मी केली याचा भ्रम आणि अभिमान ठेऊ नये असे गडकरींनी सांगितले.

संविधान हा देशाचा आत्मा आहे

 

भाजपला आरक्षण हटवायचे आहे, राज्यघटना बदलायची आहे अशी अफवा विरोधक पसरवतात. सोशल मिडीयावर देखील अशा गोष्टी वेगाने पसरल्या आहेत. यावर आपले मत मांडताना गडकरी म्हणाले की, आमच्या मनात डॉ.आंबेडकरांनी लिहीलेल्या संविधानाबाबत आदर आहे. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या लोकांनी देशात आणीबाणी लादून संविधान गुंडाळून ठेवले होते, त्यांनी आमच्याबद्दल खोटा प्रचार केला. काँग्रेस लोकांना स्वत:कडे आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे आरक्षण आणि संविधानाच्या नावाखाली जनतेला भ्रमित करण्याचे काम करते असा आरोप गडकरींनी केला.

माणसाची ओळख त्याच्या कृतूतीन होते

गडकरी म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जात, धर्म, भाषा, लिंग, पक्ष यामुळे महान बनत नसते, तर प्रत्येक जण आपले गुण आणि कार्यामुळे महान बनतो. चांगले काम हे कुणाचे पेटंट नाही सर्वाना चांगली कामे करता येतात. त्यामुळेच मी देशात 50 लाख कोटी रुपयांची कामे प्रामाणिकपणे करू शकलो. कुणीही माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. राजकारणात लोकांचा विश्वास आणि प्रेम हेच खरे भांडवल आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप झाल्यास मी राजणारण सोडण्यासही तयार आहे.

अमर्यादित अधिकार नकोत

सर्वसाधारणपणे सकारात्मक असणारे गडकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे चांगलेच संतापलेले दिसले. कालबाह्य कायदे, आठमुठे अधिकारी आणि लालफीतशाही कारभारावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या मर्यादा निश्चित कराव्यात. देशात 1980 च्या वन संवर्धन कायद्याने अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. उत्तराखंडचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, वन आणि पर्यावरण एनओसी न मिळाल्याने राज्यात 10 हजार कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली नसती तर आतापर्यंत ही विकासकामे आकाराला आली असती. गडकरी म्हणाले की, पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे आहे, मात्र कालबाह्य आणि कठोर कायदे बदलण्याची गरज आहे. तसेच अधिकाऱ्यांना अमर्यादित अधिकार नकोत असेही त्यांनी सांगितले.

इलेक्टोरल बाँडचा हेतू चांगला

देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर आपले मत मांडताना गडकरी म्हणाले की, कोणताही पक्ष पैशाशिवाय चालत नाही. काही देशांमध्ये, सरकारे राजकीय पक्षांना निधी देतात. आपल्या देशात अशी व्यवस्था नाही. म्हणून आम्ही चांगल्या हेतूने 2017 मध्ये इलेक्टोरल बाँड योजना आणली होती. राजकीय पक्षांना थेट निधी मिळावा, पण नावे (देणगीदारांची) उघड केली जाणार नाहीत. याचे कारण सत्तेतील पक्ष बदलला तर समस्या निर्माण होतील. पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही निवडणूक रोख्यांची ही प्रणाली आणल्याचे गडकरी यांनी सांगितले. आमचा हेतू चांगला होता. सर्वोच्च न्यायालयाला त्यात काही त्रुटी दिसली आणि ती सुधारण्यास सांगितले तर सर्व पक्ष एकत्र बसून एकमताने विचार करतील असे गडकरींनी सांगितले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे नितीन गडकरी यांना नागपूरकरांच्या सुख-दुःखाचे साथीदार म्हंटले जाते. गडकरींसाठी नागपूर केवळ मतदारसंघ नसून कुटुंब आहे. त्यामुळे नागपूरकर अडचणीत असले की गडकरी पुढे येतात. नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनासारख्या साथीच्या काळात, गडकरींनी आपल्या कुटुंबासाठी सदस्य जे काही करतो ते सर्व केले. तेच लोक त्यालाही आपलेच मानतात. त्यामुळे गडकरी आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहेत.

Post Views: 86
Previous Post

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच यांचे अर्धापूर नगरीत आगमन

Next Post

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; वंचितचा मार्ग ठरला, नव्या मित्रासह लोकसभा लढवणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मागील निवडणुकीत एमआयएम, यंदा आंबेडकरांच्या साथीला कोण? तिसऱ्या आघाडीसाठी जोरदार हालचाली

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; वंचितचा मार्ग ठरला, नव्या मित्रासह लोकसभा लढवणार

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886587

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697