नवी दिल्ली, २० जून, (हिं.स) – कुवेतमधील मंगाफ शहरात इमारतीला आग लागून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १५ हजार डॉलर देण्यात येणार आहे. संबंधित देशांच्या दूतावासांमार्फत ही रक्कम कुटुंबीयांना दिली जाणार आहे.
दरम्यान या घटनेत आगीमुळे गुदमरून ५० जणांचा मृत्यू झाला होता.त्यातील ४६ नागरिक हे भारतातील केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील होते.या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची सखोल चौकशी अद्याप सुरू आहे.