नांदेड – निवघा बाजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 : 00 वाजता हदगाव शहरातील नांदेड रोड ,बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर, हदगाव शहर जिल्हा नांदेड येथे करण्यात आले आहे अशी माहिती मराठवाडा उपपीठ पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी साहेब, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक बजरंग दायमा साहेब, जिल्हाध्यक्ष मुंडकर साहेब, हदगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग नरवाडे यांनी दिली.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर ,वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान ,मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत.
तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत, कायदेविषयक साक्षरता शिबिर ,रक्तदान शिबिर अंतर्गत यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांमध्ये 136270 रक्त कुपिकांचे संकलन करून शासकीय रक्तपेढ्यांना पुरविण्यात आले आहे.ब्लड इन नीड, एक पेड मॉं के नाम वृक्षारोपण उपक्रमांतर्गत ऑक्टोबर महिन्यात 110687 वृक्षारोपण करण्यात आले. आदी उपक्रम संस्थांमार्फत राबविले जातात.
या कार्यक्रमानिमित्त हदगाव शहरातून जगद्गुरुश्रींच्या पादुकांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये विविध देखावे यांचे सादरीकरण होणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे संतपिठावर आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये गुरु पूजन, उपासक दीक्षा, आरती सोहळा, जगद्गुरुश्रींचे प्रवचन,प्रवचनकाराचे अमृततुल्य प्रवचन, दर्शन सोहळा, पुष्पवृष्टी असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सामाजिक उपक्रमांतर्गत समाजातील गरजवंतांना 29 मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिवसभर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या नयनरम्य सोहळ्यासाठी जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, तालुका सेवा समितीचे पदाधिकारी,सेवा केंद्र समितीचे पदाधिकारी , आरती केंद्र समितीचे पदाधिकारी,युवासेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, प्रवचनकार, गुरु सेवक ,प्रोटोकॉल अधिकारी, आजी व माजी पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त भक्तगण, उपासक, साधक ,शिष्य ,हितचिंतक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ प्रमुख, पीठ व्यवस्थापक, जिल्हा निरीक्षक, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा समितीचे पदाधिकारी, तालुका समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

















