सोलापूर – मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभाग, रोटरी क्लब सोलापूर,आणि सरस्वती मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स हि ने प्रशाला, सोलापूर येथे सुरू असलेल्या विज्ञान व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ओ एन जी सी चे ड्रिलिंग विभागाचे निवृत्त महासंचालक श्रीयुत विद्याधर थाळणीकर यांनी गुंफले. “भूगर्भातील पेट्रोलियम अन्वेषण ते उत्पादन :-तंत्र आणि मंत्र “या विषयावर ते बोलत होते.
आपल्या दैनंदिन जीवनामधील पेट्रोलियमचे महत्त्व आपण सगळेजण जाणतो .हे पेट्रोलियम भूगर्भाखाली समुद्री जीवांच्या जीवाश्म अवशेषापासून तयार होते. त्याचा शोध घ्यावा लागतो ,याचा शोध लागल्यावरआपल्याला तेल विहिरी तयार कराव्या लागतात. आपल्याला तेल- विहिरीतून तेल मिळते.
हे तेल मिळवण्याची सुरुवात 1859 साली अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथे झाली. भारतामध्ये 1866 सालीआसाम मधील दिगबोई येथे पहिली तेल विहीर निर्माण केली .1901 साली पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आसाम मधील दिग्बोई येथेच सुरू झाला. त्यानंतर 1956 साली ओएनजीसी ची स्थापना झाली 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना झाली.
आपल्या व्याख्यानातून श्री थाळणेकर यांनी तेलाचा शोध घेण्यासाठी उपग्रह चित्रे ,भूगर्भीय नकाशे यांचा वापर करून सर्वेक्षण केले जाते, त्यानंतर तिथे किती तेल आहे याचा अंदाज घेतला जातो, भूगर्भातून तेल काढण्यासाठी चे नियोजन केले जाते ,त्यासाठी भूगर्भात खणून तेल विहिरी तयार केल्या जातात ,तेथे हे तेल साठवले जाते .
त्यानंतर हे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये नेले जाते .तेथे ते शुद्ध करून त्यापासून एलपीजी, पेट्रोल, नॅपथा, डिझेल, फ्युएल ऑइल, लूब ऑइल ,डांबर मिळवले जातात. या सर्व उत्पादनांचा उपयोग दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी बनवणया सर्व उत्पादनांचा उपयोग दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो.ही सर्व प्रक्रिया श्री थाळणेकर यांनी pptच्या सुलभपणे समजावून सांगितल्या.
आपल्या भारतामध्ये सध्या वर्षाला 30 मिलियन मॅट्रिक टन एवढेच कच्च्या तेलाचे उत्पादन होते. आपल्या देशाची एका वर्षाची कच्च्या तेलाची गरज 240 मिलियन मॅट्रिक टन एवढी आहे .सध्या आपल्याला 85 टक्के तेल आयात करावी लागते .
आपल्या सरकारने भविष्यामध्ये तेल शोधमोहीम ,तेल शुद्धीकरण प्रक्रिया यावरती जास्त निधी खर्च करायचा ठरवलेला आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या कमी केल्या आहेत .
अंदमान निकोबार बेटावर यासाठीचे संशोधन सुरू आहे .येथे तेलाचे साठे मिळाले तर भविष्यात आपली कच्च्या तेलाची सर्व गरज भागवून आपण तेल निर्यातही करू शकू. हा देशातील अतिशय मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. क्रूड ऑइल शोधणे, त्याचे उत्पादन करणे ,त्याचे शुद्धीकरण करणे, त्यापासून वेगवेगळी इंधन मिळवणे या सर्वांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.मोठ्या प्रमाणात आपले परकीय चलन वाचेल .
याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.व्यंकटेश गंभीर यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सौ धनश्री केळकर, उपाध्यक्ष श्री संदीप झवेरी,रोटेरियन श्री विजय जाधव हे उपस्थित होते.
सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुरंग देशमुख ,उपाध्यक्ष रेवती कुलकर्णी ,ज्येष्ठ सदस्य श्री दामले, श्री प्रशांत बडवे, मुख्याध्यापिका सौ.निता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी हे उपस्थित होते


















