अक्कलकोट – येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत येवला ते अक्कलकोट सायकल यात्रेचे सायकल स्वार यात्रेकरु येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन स्वामीं चरणी नतमस्तक झाले. यावेळी सायकल यात्रेतील सातारा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ९ व्या न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ.संगीता आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे आदींसह विविध क्षेत्रातील सायकल स्वारांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे हे अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून आल्याबद्दल व गेल्या २० वर्षापासून आपल्या या सायकल स्वारांना विशेष सहकार्य करीत असल्याबद्दल
पिंपळगाव जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने न्यायमुर्ती डॉ. विक्रम आव्हाड यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा संस्थेचे सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार केला.
यावेळी जावळी तालुका जिल्हा रेल्वे विभागाचे नवनाथ भोरकडे, औषध निर्माण अधिकारी रोहित पाटील, सेवा निवृत्त सेना अधिकारी युवराज गांगवे, समीर आव्हाड, अजित सैंदर, आयटी इंजिनियर प्रभाकर डुंबरे, प्रदीप हांडोरे, करनिर्धार तथा प्रशासकीय अधिकारी सागर झावरे, पैठणी क्षेत्रातील किशोर खोकले, बाळासाहेब बनकर, साईनाथ गायकवाड, उद्योजक नितीन कोकाटे, गणेश मोरे, गोरख घोटेकर, सेवा निवृत्त शिक्षक- शिक्षिका, कानवडे दांपत्य, अक्षय बनकर, अभिषेक मढे, रेवणनाथ ठाकरे, वैभव मोरे, नागेश सैंदर, नवनाथ (चिट्टी) भोरकडे, अरुण हांडोर, कैलास श्रीमंत, गौरव हांडोर, अर्जुन देवरे, रामनाथ मोरे हे सहभागी सायकल स्वार उपस्थित होते.
(चौकट – जीवन जगत असतांना बऱ्याच वेळा कळत न कळत आपल्या हातून कायद्याचा भंग होतो आणि कायद्याची सर्व सामान्याना माहिती नसल्याने न्यायालायचे द्वार ठोठावे लागते असे होऊ नये यासाठी तसेच जर असा प्रसंग ओढवलाच तर विधी सेवा प्राधिकरणा मार्फत सर्व सामान्य जनतेला कायद्याच्या चौकटीत राहून कशी व कोणती मदत मिळू शकते याबाबतची जनजागृती व श्री स्वामी दर्शनाचा संकल्प या सायकल यात्रे दरम्यान पुर्ण केलेली आहे – न्यायमुर्ती
डॉ.विक्रम आव्हाड, जिल्हा न्यायालय, सातारा)
…………………………………………….
(चौकट – सायकल यात्रेचे यंदा २० वे वर्ष आहे. गेल्या २० वर्षा पासुन सातत्याने विविध सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल यात्रेचे प्रस्थान दि. ११ जानेवारी रोजी येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथून अत्यंत उत्साहात झाले. येवला-तुळजापूर-अक्कलकोट असा ५६५ किमी सायकल प्रवास करीत असताना ठीक ठिकाणी शाळा, महाविद्यालय व न्यायालय परिसरात कायदेविषक मार्गदर्शन शिबिर, बालविवाह प्रतिबंध कायदा २००६, गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५,
विधी सेवा अधिनियम १९८७ बाबत
जनसामन्यात जनजागृती, निसर्ग जोपासना व संवर्धन, पर्यावरणचा होणारा ऱ्हास, सायकलचा जास्तीत जास्त वापर म्हणजे प्रदूषणाला आळा, पतंग नायलॉन मांजाचा वापरास प्रतिबंध इत्यादी विषयासंदर्भात जन जागृतीस्पर माहिती फलक या सायकल यात्रेत सायकलला लावून जनजागृती करण्यात आली आहे.
सायकल स्वारीतील जनजागृती सुचना फलकांच्या माध्यमातून नागरीक नक्कीच बोध घेतील अशी अपेक्षा – विजय भोरकडे, अध्यक्ष, जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगांव-जलाल)
विशेष बातमी – संकलन – श्रीशैल गवंडी (श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट)

















