हदगाव – शिऊर साखर कारखाना लि.वाकोडी व श्री सुभाष शुगर प्रा. लि.हडसनी या दोन्ही कारखान्या क्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या विश्वासाने व चांगल्या उत्तम सहकार्याने गाळप हंगाम २०२५-२६ यशस्वीपणे चालू असून दोन्ही कारखान्यात मिळून प्रतिदिन १०,००० मे. टन गळप चालू असून गेटकेन विभागातील ऊस उत्पादकांनी न घाबरता इतर कारखान्यास गाळपास आपला ऊस देऊ नये व लागवड हंगाम २०२५-२६ पुरवठा प्रोत्साहन योजनेचे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आव्हान अध्यक्ष सुभाषराव देशमुख व कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी केले आहे.
हदगाव- हिमायतनगर,उमरखेड , कळमनुरीसह कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी गेटकेन विभागातील शेतकऱ्यांनी न घाबरता इतर कारखान्यास ऊस देऊ नये कारण यावर्षी महाराष्ट्रात सर्व भागात भरपूर पर्जन्य मान्य झाले असून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे इतर प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात देखील भरपूर प्रमाणात ऊस लागवड झाली असून ते पुढील वर्षी आपला ऊस गाळपास घेऊन जाणार नाहीत तरी आपला हक्काचा शिऊर साखर कारखाना व श्री सुभाष शुगर प्रा. लि. हडसणी या कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याचे आव्हान यावेळेस करण्यात आले.
पंधरवडा योजना पुढील प्रमाणे असून १ ते १५ फेब्रुवारी २०२६ जाहीर केलेला अंतिम दर २७५१ रु. तर प्रोत्साहन पर रक्कम २५ रु. असून एकूण २७७६ रु. दर राहणार आहेत.१६फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ जाहीर केलेला अंतिम दर २७५१ रु.तर प्रोत्साहनपर रक्कम १०० रु. एकूण २८५१ रु.दर राहणार आहेत.१६ मार्च ते पुढे २०२६ जाहीर केलेला अंतिम दर २७५१ रु. तर प्रोत्साहनपर रक्कम २०० रु.एकूण २९५१ रु. अंतिम दर राहणार आहे.
आपल्या हदगाव – हिमायतनगर सह उमरखेड, कळमनुरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांची कामधेनु म्हणून नावलौकिक मिळवलेले श्री सुभाष शुगर प्रा.लि. हडसनी व शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी या कारखान्यास आपला ऊस मोठ्या प्रमाणात गाळपास देऊन आपली प्रगती व आर्थिक फायदा करून घ्यावे आम्ही नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी हितासाठी व समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कार्यकारी संचालक सुशील कुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

























