जेऊर – युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद असलेली केळी निर्यात सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना करण्यात आली आहे यासंबंधी मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्र्यांना देण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या इराण इस्त्राईल अमेरिका युद्धाचा परिणाम केळी निर्यातीवर झाला असून सोलापूर जिल्ह्यातून होणारी केळी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे
याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला असून शेतकरी अडचणीत आला आहे.हजारो टन केळी सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये व निर्यात बंदरावर अडकून राहिलेली आहे.
शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावरील केळी उत्पादनासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च होतो सध्या निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांची केळी खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केले आहे त्यामुळे फार मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होत असून शासनाच्या वतीने लवकरात लवकर केळी निर्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेकेली आहे.
करमाळा तालुक्यातील कंदर येथील निर्यातदार शेतकरी किरण डोके, सोमनाथ हुलगे, किरण पाटील ,अंगद पाटील,आण्णासाहेब कदम ॲड बसळे यांच्यासह करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन यासंबंधी त्यांना निवेदन देऊन केळी निर्यात लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.























