Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खंडणी, मारहाण व जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; १४ दिवसांच्या उपोषणानंतर गुन्हा दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in crime
0
खंडणी, मारहाण व जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; १४ दिवसांच्या उपोषणानंतर गुन्हा दाखल
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – शहरातील लक्कडकोट परिसरातील श्रीजीत ट्रेडर्स दुकानावर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, मारहाण, तोडफोड आणि तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग १४ दिवस उपोषण करून न्यायासाठी लढा देणाऱ्या सौ. जयश्री संजय कटके यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन हलले असून, संबंधितांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास लक्कडकोट येथील न.भू.क्र. १०५७३ वरील श्रीजीत ट्रेडर्स या दुकानावर १० ते १२ इसम आणि ८ ते १० महिलांनी एकत्र येत जबरदस्तीने गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील साहित्याची तोडफोड करत मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले. यावेळी संबंधितांनी लोखंडी सळईसारखी हत्यारे हातात घेऊन धमक्या देत दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या फिर्यादीत सौ. जयश्री कटके यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता संबंधितांनी आम्हाला ही जागा आम्ही सुपारी घेऊन ताब्यात घेत आहोत असे सांगितले. तसेच ५० लाख रुपये द्या, नाहीतर जागा सोडा अशी उघडपणे खंडणी मागण्यात आली. आम्हाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

या घटनेत दुकानातील फ्रीजचे हॅण्डल तोडणे, ग्रेनाईट-मार्बल साहित्याची नासधूस करणे, महत्त्वाचे कागदपत्रे व बिलबुक काढून नेणे, तसेच दुकानातील इतर साहित्याचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारात अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, प्रणय अनिल राठी, गोविंद राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी, आदित्य मालपाणी, सुरेश मालपाणी यांच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महेंद्र रत्नपारखे, विजय पवार, किशोर जाधव, आकाश जाधव, वनमाला शर्मा यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या घटनेपूर्वीही सौ. कटके यांनी दि. १९ मार्च, ३० मार्च, ८ एप्रिल, १० एप्रिल आणि २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर केले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी दि. १४ एप्रिलपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. अखेर १४ दिवसांच्या संघर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत जबरदस्तीने ताबा घेणे, मारहाण, धमक्या देणे, खंडणी मागणे, मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जर एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी १३ दिवस उपोषण करावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा गुन्हेगार प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणात दोषींवर कितपत कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषण स्थळी डॉ. वैभव ढाकणे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे बाबा हरणे, सोमनाथ उबाळे, राजमाने यांनी सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपोषण सोडले आणि पुढील उपचारासाठी दीपक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

Post Views: 37
Previous Post

शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्माकर कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Next Post

घोडके कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
घोडके कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार

घोडके कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914783

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697