Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2024
in solapur
0
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

|| भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी ||
सुमारे आठशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार झाला. गुजराथ राज्यात भडोच नगरात विशाळदेव नावाचा प्रधान राज्य कारभार सांभाळत असे.त्याच्या पत्नीचे नाव माल्हनीदेवी असे होते. या दाम्पत्याच्या उदरी हरीपाळदेवाचा जन्म झाला. सर्वांना अपार आनंद झाला. हरीपाळाचं बालपण कोडकौतुकात गेले. हरीपाळदेव हा फार सुंदर होता. पुढे त्याने अनेक शस्त्रास्त्र विद्या, वेद विद्यादींचे शिक्षण घेतले.

तो सर्वांचा लाडका, प्रजाहितदक्ष आणि शूरवीर होता. ‘कमला’ नावाच्या एका कुलीन, सुंदर, सुशील मुलीबरोबर त्याचे लग्न झाले. त्याला महिपालदेव नावाचा एक सुंदर मुलगा झाला. सांसारीक जीवन पूर्णतृप्त आनंदात व्यतीत होत असताच, गुजरातवर देवगिरीच्या सिंघणदेव यादवाने आक्रमण केले. वयाच्या २५/२६ व्या वर्षी ते
आक्रमण परताऊन लावण्याचा पराक्रम हरीपाळदेवाने केला.मिळालेलं हे यश पाहून राज्याचा भावी राजा म्हणून त्याला सर्वजण आदराने पाहू लागले.परंतु त्यानंतर अल्पशा आजाराने हरीपाळ आजारी पडला आणि त्यातच त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. राजपरिवार आणि सर्व प्रजाजन हळहळले सर्वत्र दुःखाचा आक्रोश पसरला.

मोठ्या जड अंतःकरणाने, दुःखावेगात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. नर्मदेच्या राजघाटावर अंत्ययात्रा आली.चंदनाच्या चितेवर हरीपाळदेवाचे कलेवर ठेवण्यात आले.पिता विशाळ देवावर आपल्या प्रिय पुत्राला भडाग्नी देण्याची पाळी आली होती. पुत्र मुख शेवटचे पहावे म्हणून विशाळदेव सामोरे आले आणि पाहतात तो हरीपाळदेवांच्या डोळ्यांची हालचाल त्यांना दिसली,ते आनंदाने आणि आश्चर्याने ओरडलेच कुमरु जीआला ! कुमरु जीआला !!
हे शब्द ऐकून सर्व जन आश्चर्य चकित झाले,आणि सर्वत्र आनंदसागर पसरला. हरीपाळदेव जीवंत आहे, हरीपाळदेव जीवंत आहे,

ही चर्चा सर्वत्र सुरू झाली. हरीपाळाची हालचाल सुरू झाली त्यांना चितेवरून उठवून पालखीत बसवून वाजतगाजत नगराकडे आणले आणि राजवाड्यातून गेलेली शोक यात्रा आता आनंद यात्रेत परिवर्तीत होऊन राजवाड्यात परत आली. सर्व प्रजा जनाला आनंद झाला. पिता विशाळदेव, माता माल्हनीदेवी,पत्नी कमलाराणी आणि लहानगा पुत्र महिपाळदेव यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सर्व काही पूर्ववत सुरू झाले. पूर्वीचाच हरीपाळदेव जीवंत झाला असे सर्वांना वाटले, परंतु विशाळ देवांना मात्र दाटसंशय वाटू लागला की,

हा पूर्वीचाच हरीपाळ नाही. कुणीतरी सिद्ध साधकांने हरीपाळाच्या शरीरात परकाया प्रवेश केला असावा. प्रथम विशाळदेवाने आपले गृप्त हेर पाठवून दऱ्या, डोंगराच्या कपारी,गुहा,गुंफा आदी ठिकाणी शोधून काढले, पण कुढेही असा कोण्या सिध्दसाधकाचा देह पडलेला दिसला नाही. नंतर त्याने आपल्या पत्नीला आणि हरीपाळाच्या पत्नीला सांगून त्याच्या बालपणातील किंवा एकांतातील प्रसंगाचे त्याला स्मरण आहे, की नाही हे तपासून पहायला सांगितले. बालपणीच्या खेळणे आदी वस्तू त्याला विचारताच हरिपाळ देवाने सर्व काही व्यवस्थित सांगितले.सर्वांची खात्री झाली की, हा पूर्वीचाच हरिपाळदेव आहे. त्याप्रमाणे सर्वकाही सुरळीत राज्यकारभार सुरू झाला.

परंतु हा पूर्वीचाच हरिपाळ नव्हता तर हरिपाळ देवाच्या शरीरात द्वारकेचे श्री चक्रपाणि महाराज यांनी परकाया प्रवेश केला होता .कामाख्या हटयोगिनीच्या रती सुखाच्या आग्रहाखातर श्री चक्रपाणी महाराजांनी आपले शरीर त्यागून हरिपाळ देवाच्या शरीराचा स्वीकार केला होता. हा नवा असा परमेश्वराचा पतितोद्धारक अवतार म्हटल्या जातो. परमेश्वर अवतार धारण करतात तेव्हा तीन परीने अवतार धारण करतात. १) गर्भ, २) दवडणे, ३) पतीत. १) गर्भातही परमेश्वर अवतार धारण करतात.२) एखाद्याच्या शरीरातील जीवाला काढून तेथे स्वयं अवतार धारण करतात.

३) पतीत, शरीरातून जीव गेला म्हणजे त्या पडलेल्या शरीराचा स्विकार करणे हा पतीतोद्धारक अवतार.
या हरीपाळाने पूर्वीच्या हरीपाळाच्या सर्वकाही सवयी स्वीकारल्या गोपाळ,मंत्री दीक्षा, गोपाळणी अन् द्यूत क्रीडा, पत्नीवर प्रेम या सर्व त्याच्या गुणधर्माचा स्वीकार करून काही दिवस हरिपाळदेव गुजरात राज्याचे कार्य करीत राहिले, परंतु तेथे त्यांचे मन रमेना. हे सर्व सोडून एक दिवस आपण महाराष्ट्रात जिवोद्धार कार्य करण्यासाठी निमित्त शोधले पाहिजे म्हणून त्यांनी एकदिवस द्यूतक्रिडेत अमाप धन, द्रव्य हरले.त्यामुळे जुआरीयांकडून उसने धन द्रव्य घेऊन हार स्विकारण्याची प्रवृत्ती धारण केली

आणि त्यांना ते उसने घेतलेले द्रव्य देण्यासाठी आपल्या पत्नीला अलंकार मागितले. तिने नकार दिल्यामुळे हरिपाळ देवांनी उदासीनता स्वीकार केली आणि देणे दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही, अशा प्रकारे व्रत धारण केले. शेवटी विशालदेवाला हे सर्व समजले आणि त्यांनी देणेकरीयांचे देणे दिले, परंतु त्या दिवसापासून हरिपाळ देवांनी कमळाराणीविषयीची खंती स्वीकारून उदासीनता स्वीकार केली,संसारात त्यांचे मन रमेना आणि एक दिवस त्यांनी घरदार सोडण्यासाठी रामटेक यात्रेचे निमित्त शोधले.

राज्यवैभव सोडण्याचा निश्चय पक्का केला. मला राम यात्रेला जाऊ द्या, असे आपल्या पित्याला ते म्हणाले तेव्हा विशालदेव म्हणाले पुत्रा ते शत्रूचे राज्य. तेथे तुला काहीही धोका होऊ शकतो, परंतु विशाळ देवाचे म्हणणे टाळून हरिपाळदेवाने रामटेकच्या यात्रेला जाण्याचा निर्धार पक्का केला. यात्रेला जाऊ देत नाही, म्हणून त्यांनी आपल्या आहारातील एक एक पदार्थ वर्ज केला आणि शेवटी केवळ पाणी भात एवढीच आरोगणा भोजन म्हणून स्वीकार करु लागले.तेव्हा त्यांची प्रकृती क्षिण होत चालली,

ते पाहून मालनी देवी मध्यस्थी पडल्या आणि शेठ,सावकाराप्रमाणे हरिपाळालाही रामटेक यात्रेला जाऊ द्यावे,असा आग्रह धरला. त्यानुसार हरिपाळदेव रामटेक यात्रेच्या निमित्ताने गुजरातचे राजवैभव सोडून महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. बरोबर विशाल देवाने बरेच सेवक सैनिक दिले, परंतु प्रत्येक मुक्कामाहून एक एक सैनिक सेवक परत पाठवला आणि काजळे देऊळवाडा या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या दोन सेवकांनाही झोपेतच सोडून हरिपाळदेव ऋद्धपुर या ठिकाणी श्री गोविंद प्रभुंच्या भेटीसाठी निघाले.

ऋद्धपुर या ठिकाणी रांधवन हाटा मध्ये श्री गोविंद प्रभू एका हलवायाच्या दुकानावर शेंगुळबुडे खात होते, श्री गोविंद प्रभूना हरिपाळदेवाने सविनय प्रणिपात केला. श्री गोविंद प्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या हातातील शेंगूळबुडे हरीपाल देवाकडे फेकले, हरीपाळ देवाने ते वरचेवर झेलले, व ग्रहण केले. आणि श्रीप्रभू म्हणाले “आवो मेला जायेः चक्रा होय म्हणेः चक्रु होय म्हणेः श्री चक्रधरू होयेची म्हणे ” या अलौकिक लीळेतून हरिपाळ देवाने, श्रीचक्रधर या श्रीप्रभुंनी दिलेल्या प्रसादिक नावाबरोबरच परावर ज्ञान शक्तीचाही स्वीकार केला आणि हरिपाळ देवाचे नाव आता श्री चक्रधर स्वामी असे झाले.

श्री गोविंद प्रभूची प्रेरणा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे जीवोद्धारासाठी परिभ्रमणाला निघाले. प्रथम ते सालबर्डी या ठिकाणी आले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त वाचकांच्या सेवेत ही सेवा अर्पण करीत आहो.

*न्यायंबासबाबा उपाख्य सैन्गराज शास्त्री महानुभाव* मकरधोकडा जि.नागपूर
(प.पू. न्यायंबासबाबा शास्त्री महानुभाव )

Post Views: 42
Previous Post

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांदावर आलो -आदित्य ठाकरे

Next Post

काँग्रेसचा बैलपोळा…. नवचैतन्याचा सोहळा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काँग्रेसचा बैलपोळा…. नवचैतन्याचा सोहळा…

काँग्रेसचा बैलपोळा.... नवचैतन्याचा सोहळा...

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ कॅमेरा मध्ये कैद

April 11, 2026

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802927

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697