Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागला आहे ; अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर करा 

तरुण भारतbyतरुण भारत
January 9, 2026
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये तत्व सोडून, विचार सोडून अभद्र युती बघायला मिळत आहेत. पक्ष आणि विचार आता महत्त्वाचा राहिला नाही तर सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. मतदारांनी आता अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे. टेंडर मिळविण्यासाठी निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी खून ही करण्यात येतो. महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात यापूर्वी बिनविरोध येण्यासाठी प्रयत्न केले होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

         वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेसाठी सोलापुरात आले असताना सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी मी सांगितले होते की राज्यात अभद्र युती पाहायला मिळेल. अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्रात भाजप एमआयएम आणि भाजप काँग्रेस यांची युती झाली असल्याचे पाहिले. ही अभद्र युती आहे. अभद्र युती प्रकरणी काँग्रेसने कारवाई केली मात्र 24 तास उलटूनही भाजपाने कारवाई केली नसल्याचे दिसून येते. आता राजकारणात पक्ष आणि विचार महत्त्वाचा राहिला नाही सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्वाचे झाले आहे एका बाजूला देशावर संकट आहे दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर देश हाकण्याची धुरा आहे ते अनैतिक पद्धतीने वागतात. अशा अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा , असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

     दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली ही समाजवादी विचारांची युती आहे. नांदेड, लातूर येथे काँग्रेस बरोबर वंचितने युती केली आहे. जिथे पाटीलशाही ने लोकशाही स्वीकारली तिथे आम्ही युती केली. इतर ठिकाणी शक्य झाली नाही, असे ते म्हणाले. काहीजण मनाने एकीकडे तर शरीराने दुसरीकडे अशी स्थिती राजकारणात पाहायला मिळत आहे. सन 2014 पासून आम्हाला दूर ठेवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था भाजपा सांगेल तसे नाचण्यासारखी स्थिती झाली आहे. त्या सगळ्यांची रिपाइं झाली असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.

        बिनविरोध निवडणुका संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, दबावाचे, धमक्याचे राजकारण चालले आहे. महाराष्ट्र  बिहारच्या दिशेने चालला आहे. आता मारण्यापर्यंत ते विकत घेण्यापर्यंत प्रकार चालला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अर्धे उमेदवार भीतीपोटी अर्ज भरायला आले नाहीत. त्यांना दम दिला असल्याचा आरोपही यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केला. युद्ध टाळण्यासाठी या निवडणुकीत भाजपा विरोधात मत द्या. महापालिका गटारात अडकली आहे. या निवडणुकीत पैसे वाटणाऱ्याला मत देऊ नका. पैसे घ्या पण पैसे न देणाऱ्यांना मतदान करा, असे आवाहनही यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केले.

         दरम्यान, काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही सोलापुरातील त्यांच्या एका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा चळवळीतील पक्षाचे उमेदवार मल्लपा शिंदे हे टिकून राहिले होते, अशी आठवणही ॲड. आंबेडकरी यांनी करून दिली. 

      या पत्रकार परिषदेस प्रभारी सोमनाथ साळुंखे, प्रवक्ते अरुण जाधव, डॉ. नितीन ढेपे, चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे आदी उपस्थित होते. 

ड्रग्ज प्रकरणी मोदी, शहा यांनी खुलासा करावा 

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ड्रग्ज प्रकरणी केलेल्या विधानासंदर्भात विचारले असता ॲड. आंबेडकर म्हणाले, शासन, गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली हा विभाग असताना असे घडले कसे असा सवाल उपस्थित करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात खुलासा करावा, असे आवाहन केले.

दोन्ही पवारांनी भाजपला उल्लू बनवले 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही वेगळे नाहीत. ते एकत्र आहेत. त्यांनी मिळून भाजपाला उल्लू केले आहे. दोघांचीही चौकशी थांबविण्यासाठी त्यांनी तसं केले. आतापर्यंत त्यांची केस भाजपाने दाबून का ठेवली याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

कुणाच्या रक्तात किती भाजप आहे ? ते लवकरच दिसेल 

सोलापुरात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केला. त्यानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी माझ्या रक्तात काँग्रेस आहे असे म्हटले आहे. या संदर्भात बोलताना ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, कोणाच्या रक्तात किती भाजप आहे ? ते लवकरच दिसेल ? दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळेल, असे त्यांनी असे ते म्हणाले.

Post Views: 69
Previous Post

वेळापूर पोलिसांनी २१ लाख ६७ हजाराचा चा गुठखा पकडला

Next Post

सोशल उर्दू हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षक रसूल चौधरी यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोशल उर्दू हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षक रसूल चौधरी यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822080

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697