Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैकुंठ स्मशानभूमीत समस्यांची मांदियाळी, अंत्यसंस्कार करताना नातेवाईक किंवा आप्तस्वकीयांना सोसाव्या लागतात मरण यातना

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – येथील वैकुंठ स्मशानभूमी मध्ये समस्यांची अक्षरश: मांदियाळी दिसून येते आहे. त्यामुळे एखाद्या आप्तस्वकीयांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आलेल्या महिला, वृध्दांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने वैकुंठ स्मशान भूमीतील समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे शहरातील नागरिकांतून बोलले जात आहे.

शहरात एकमेव वैकुंठ स्मशानभूमी आहे. उपनगरातील टाकळी भागात एक स्मशानभूमी असून तीचे अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे. कारण या उपनगरातील स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नाहीत.आत्तापर्यंत पंधरा, वीस वर्षात केवळ एक, दोन जणांच्या मृतदेहावर या स्मशानभूमीत केवळ (शहरात पुरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्य वैकुंठ स्मशानभूमीत पाणी होते ) नाईलाजास्तव अंत्यसंस्कार करावे लागलेले आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील नागरिकांना गावाभागा मध्ये असलेल्या एकमेव वैकुंठ स्मशानभूमीतच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र गेल्या कित्येक महिन्या पासून या वैकुंठ स्मशानभूमीला देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेले दिसत आहे.

या वैकुंठ स्मशानभूमीतील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे या ठिकाणी अंत्यसंस्कारा साठीचे कट्टे किंवा चबुतऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे एकाच दिवशी अनेक मृतदेह अत्यसंस्कारासाठी आल्यावर प्रत्येक मृतदेहासाठी स्वतंत्रपणे कट्टे किंवा चबुतरे उपलब्ध होत नाहीत. अनेकांना कट्यां शिवाय खाली जमीनीवरच किंवा एकाच कट्यांवर दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात.
या स्मशानभूमीत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात तेथील चबुतऱ्याच्या किंवा कट्यांची जमीन देखील एकसारखी सपाट दिसत नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी रचलेले सरपण किंवा लाकडे देखील ढासळली जातात. या बरोबरच स्मशानभूमीत पाण्यासाठी असलेला हातपंप हा देखील खूप दूरअंतरावर असल्यामुळे वयोवृध्द नागरिकांचे हाल होतात. पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना उभारण्यासाठी जवळच आडोसा किंवा एखादे पत्राशेड नसल्यामुळे देखील नागरिकांना अडचणीचे होते.

येथील वैकुंठ स्मशानभूमीत मोकाट जनावरांचा सर्रास वावर दिसुन येतो. त्याला देखील प्रतिबंध करण्याची गरज आहे. स्मशानभूमीत सर्वत्र काटेरी वनस्पती वाढलेल्या दिसतात. त्यामुळे पालिकेने या काटेरी वनस्पती काढून त्या ठिकाणी सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांचे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा परिसर देखील प्रसन्न होण्यास मदत होईल. स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे आहेत मात्र त्याची देखील संख्या अपुरी आहे. झाडांच्या कडेला गोल कट्टे बांधलेले आहेत मात्र त्या ठिकाणी तेलकट तांबड्या मोठ्या मुंग्याची मांदियाळी असते. त्यामुळे बसलेल्या माणसाला या मुंग्या चावल्या तर त्याची काही धडगत उरत नाही. गेल्या तीन ते चार वर्षापासून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नाही. तरी देखील पालिका आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीस देखील अनेक समस्यांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे. या समस्या दूर करण्यासाठी पालिकेच्या आधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.


———————————
पालिकेकडून नियमीत स्वच्छतेची गरज
या बरोबरच स्मशानभूमीला देखील बकाल अवस्था आलेली दिसत आहे. कारण स्मशानभूमीत नियमीत स्वच्छता ठेवली जात नाही. अंत्यसंस्कारा नंतर स्मशानभूमीत लाकडी बांबू, मृतदेहाच्या अंगावरील कपडे, कापसाच्या उश्या तसेच गाद्या या बरोबरच प्रेताच्या गळ्यातील फुलांचे हार, फुटकी मातीची मडकी, काचेच्या बांगड्या, राँकेलचे कँन आदी सामान सर्वत्र पडलेले दिसुन येतात. त्यामुळे स्मशानभूमीत नियमित साफसफाईची गरज आहे.
—————————–


कायमस्वरुपी सुरक्षा व सीसीटिव्हीची व्यवस्था आवश्यक
येथील स्मशानभूमीत वेडेभिक्षेकरी, गांजा ओढणारी मंडळी, दारुडे, जुगारी, वाळु चोरटे,मटका घेणाऱ्या मंडळींचा सततचा वावर असतो. या ठिकाणी अनेक अवैध प्रकार किंवा धंदे देखील दिवसरात्र सुरु असतात. त्यामुळे या मंडळींना चाप बसण्यासाठी पालिकेने या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. या बरोबरच या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणेची देखील गरज आहे. त्यामुळे उपद्रवी (दारुडे, जुगार, मटका घेणाऱ्या) मंडळींना चांगली जरब बसुन येथे चालणारे अवैध प्रकार किंवा धंदे बंद होण्यास मदत होईल.

Post Views: 76
Previous Post

त्रिलोकीचा स्वयंभू खंडेराया माझा ; उधळला वारू अन भंडारा 

Next Post

पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांची विकास बँकेस सदिच्छा भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांची विकास बँकेस सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

September 11, 2026
कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

September 11, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

September 11, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

September 11, 2026

विद्यार्थ्यांच्या हातून घडणार पर्यावरणपूरक गणराय

September 11, 2026
सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

September 11, 2026
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

September 11, 2026
गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1192647

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!