Wednesday, August 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारताशी संबंध कटू, व्हिएन्ना करार मोडल्याचा कॅनडाचा आरोप, काय आहे हा नेमका करार ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 26, 2023
in india
0
भारताशी संबंध कटू, व्हिएन्ना करार मोडल्याचा कॅनडाचा आरोप, काय आहे हा नेमका करार ?
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Vienna Convention: खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाल्यानंतर आणि या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा थेट हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केल्यानंतर या वादाची ठिणगी पडली.

भारत-कॅनडा या दोन्ही देशांच्या संबंधांत सध्या बरीच कटुता आली आहे. खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाल्यानंतर आणि या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा थेट हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केल्यानंतर या वादाची ठिणगी पडली.

भारताने कॅनडाचे हे आरोप तातडीने फेटाळून लावले आणि या आरोपाचे पुरावे देण्याची मागणी केली. त्यानंतर ट्रुडो यांची भाषा नरमली असली, तरी भारतावरील आरोपावर ते कायम आहेत. अलीकडेच भारताने कॅनडाचे आपल्या देशात असलेले अतिरिक्त ४१ राजनैतिक अधिकारी परत पाठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर कॅनडाला हे अधिकारी कमी करावेच लागले. मात्र, तसे करताना भारताने ‘व्हिएन्ना करारा’चे उल्लंघन केले आहे, असा आरोप कॅनडाने केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हाही आरोप फेटाळून लावला आहे. या निमित्ताने ‘व्हिएन्ना करारा’ची बरीच चर्चा होत आहे. तेव्हा या कराराविषयी जाणून घेणे सयुक्तिक ठरावे.

काय आहे व्हिएन्ना करार?

कोणत्याही दोन देशांमधील राजनैतिक स्तरावरील संबंधांचे हे एक मार्गदर्शक पुस्तक आहे, असे म्हटले तरी चालेल. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगाने हा ५३ कलमी मसुदा तयार केला आहे. ‘राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना करारा’च्या या मसुद्यावर १८ एप्रिल १९६१ रोजी ६० देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार २४ एप्रिल १९६४ रोजी अंमलात आला. सध्या संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या सर्व १९३ देशांची या कराराला मान्यता आहे. कॅनडा या करारावर अगदी सुरुवातीला स्वाक्षऱ्या करणाऱ्या देशांपैकी एक होता. कॅनडाने ५ फेब्रुवारी १९६२ रोजी कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली, तर २६ मे १९६६ रोजी हा करार अधिकृतरीत्या स्वीकारला. भारताने अगदी सुरुवातीला या करारावर स्वाक्षरी केली नव्हती. मात्र, १५ ऑक्टोबर १९६५ रोजी भारतानेही या करारावर स्वाक्षरी केली. भारताने शुक्रवारी या कराराच्या कलम ११.१ चा वापर करून कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या परतपाठवणीची मागणी केली आणि कॅनडालाही ती स्वीकारावी लागली. सध्या भारताचे २० राजनैतिक अधिकारी कॅनडात आहेत. कॅनडाचेही तेवढेच अधिकारी भारतात असावेत, असे सांगून भारताने जादा ४१ अधिकाऱ्यांना कॅनडाला परत जाण्यास सांगितले.

दोन्ही देशांचे म्हणणे काय?

भारताने कॅनडाचे ४१ अधिकारी परत पाठविण्याचा आग्रह धरल्याबरोबर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलॅनी जोली यांनी, हा व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचा आरोप केला. ‘आम्ही आमचे अधिकारी परत बोलावले नाहीत, तर भारताने एकतर्फी या अधिकाऱ्यांचे राजनैतिक संरक्षण काढून घेतले असते आणि मग आमच्या संबंधित अधिकाऱ्यांचा जीवही धोक्यात येऊ शकला असता. हे आंतरराष्ट्रीय कराराच्या विरोधात आहे.’ यावर भारताने कॅनडाचा आरोप साफ फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, ‘भारत व कॅनडाचे सध्याचे संबंध बघता, या देशाच्या अतिरिक्त अधिकाऱ्यांची भारतात उपस्थिती अयोग्य आहे. या अधिकाऱ्यांची स्थानिक प्रश्नांत ढवळाढवळ अमान्य आहे आणि त्यामुळेच दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या संख्येत समानता आणणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही जे केले, ते व्हिएन्ना कराराच्या कलम ११.१ नुसार योग्य आहे.’

कलम ९ काय सांगते?

भारताने कलम ११.१ चा उल्लेख केला असला, तरी सध्याच्या परिस्थितीत व्हिएन्ना कराराचे कलम ९ हेही भारतासाठी महत्त्वाचे आहे. हे कलम ‘नको असलेल्या अधिकाऱ्यां’विषयी (पर्सोना नॉन ग्राटा) भाष्य करते. कलम ९.१ मध्ये म्हटले आहे, ‘एखाद्या देशाचा राजनैतिक अधिकारी वा अनेक अधिकारी यजमान देशाला नको असतील, तर ते कोणतेही कारण न देता, पाठविणाऱ्या देशाला संबंधित अधिकाऱ्यास तातडीने माघारी बोलावण्यास सांगू शकतात. अशा वेळी संबंधित अधिकारी ‘अस्वीकारार्ह’ किंवा ‘स्वागत न करण्याजोगा’ आहे, एवढाच उल्लेख पुरेसा आहे. यजमान देशाने असे सांगितल्यावर पाठविणाऱ्या देशावर त्या अधिकाऱ्यास माघारी बोलावणे किंवा दूतावासामधील त्याची सेवा तातडीने खंडित करणे बंधनकारक असेल.’

त्यामुळे भारताने करारातील विविध कलमांचा वापर करूनच कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना त्यांच्या मायदेशी परत धाडले आहे. यात व्हिएन्ना कराराचा कोणताही भंग होत नाही आणि आपल्या परराष्ट्र मंत्रालयानेही हेच ठामपणे नमूद केले आहे.

Post Views: 158
Previous Post

मराठा समाज सदावर्तेंच्या गाडीवरील हल्ल्याचं समर्थन करत नाही | मनोज जरांगे

Next Post

बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत १० ठार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत १० ठार

बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत १० ठार

ताज्या बातम्या

उजनी धरणातील प्रस्तावीत सौरऊर्जा प्रकल्प व मासेमारीचा खासगी ठेका रद्द करा#news

August 12, 2026

कोपरा कमी केला आणि महानगरपालिकेचे 25 कोटी वाचले #news #marathinews #solapurnews

August 12, 2026

बापरे एमपीएससीच्या 5707 जागांसाठी अकरा लाख अर्ज

August 12, 2026

सर्वच विधी महाविद्यालयात कॅप राऊंड मध्ये #news #marathinews #viral

August 12, 2026

ध्रुवराठीचा तो व्हिडिओ डिलीट

August 12, 2026

एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे सत्यसाईबाबा नगर परिसरातील नागरिक संतप्त

August 12, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

August 12, 2026
प्राचार्या रेखा पाटील यांना एम.आय.टी .व्ही जी. एस शाळेचा दुहेरी पुरस्कार

प्राचार्या रेखा पाटील यांना एम.आय.टी .व्ही जी. एस शाळेचा दुहेरी पुरस्कार

August 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1053710

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!