ओले आले या सिनेमानिमित्त नाना पाटेकर वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशन करत आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या संघर्षाचा अंगावर काटा आणणारा किस्सा शेअर केला.
बॉलिवूडवर देखील आपल्या अभिनयाची छाप पाडून अधिराज्य गाजवणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे नाना पाटेकर. नानांनी मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतळी अनेक भूमिका गाजवल्या त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.
नाना लवकर मराठी सिनेपडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांचा ओले आले हा सिनेमा ५ जानेवारी रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. त्यामुळे नाना या सिनेमांच जोरदार प्रमोशनही करतना दिसतात. नुकतेच त्यांनी झी मराठीवरील लोकप्रिय झो चला हवा येऊ द्यामध्ये उपस्थिती लावलेली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणीचा हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला.
ते म्हणाले की, ‘’आता असं वाटतंय की मुलांमध्ये आणि बापामध्ये अंतर वाढत चालले आहे. कारण काय ते मला माहित नाही… आमच्या वेळी असं होतं आणि आमच्या वेळी तसं होत असं नाही पण तरीसुद्धा सांगत असताना माझ्यावेळी… माझा बाप माझ्यासाठी काय करतो हे मला माहिती होतं. अचानक माझ्या बाबांची सर्व इस्टेट निघून गेली, कोणीतरी काढून घेतली. आणि अचानक फार श्रींमत असलेला आमचा बाप आज एकदम रस्त्यावर आला होता.’’
’ हवालदिल झाल्यासारखे वडील बसलेले होते तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ तिथे होतो. मी माझ्या वडिलांना म्टहटलं की तुम्ही काळजी का करता? एकच कारखाना गेला ना तुमचा…. दोन कारखाने आहेत तुमच्याकडे हा एक आणि दुसरा मी (नाना पाटेकर आणि त्यांचा मोठा भाऊ), काळजी करु नका सर्व काही नीट होईल’’.
‘’मग वयाच्या १३ व्या वर्षी मी नोकरीला लागलो. महिन्याला ३५ रुपये मिळायेच मला आणि सोबत एक वेळचं जेवण. तेव्हा रात्री जेवत असताना मला नेहमी प्रश्न पडायचा की, घरी वडील जेवले असतील का? आई जेवली असेल का? पण पोटातली भूख इतकी असायची की मी जेवायचो…’’ नानांच्या या किस्स्याने तिथे उपस्थित सर्वच जण स्तब्ध झालेले.
ओले आले या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्या, त्यात नाना पाटेकर यांच्यासोबत अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सिद्धार्थ चांदकर यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.