सोलापूर, 2 ऑगस्ट (हिं.स.)।आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या अनगरसह दहा गावांच्या सिंचन योजनेचा प्रस्ताव लवकर सादर करा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ यांना केल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी भेट घेतली.
यावेळी आष्टी उपसा सिंचन योजनातून पाण्यापासून वंचित राहिलेल्या अनगरसह दहा गावांच्या सिंचन योजनेच्या प्रस्तावा संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य अभियंता पुणे जलसंपदा विभाग यांच्याकडे असलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तात्काळ शासन दरबारी सादर करावा, अशा सूचना पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ यांना दिल्या. यावेळी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश चवरे,अनिल कादे उपस्थित होते