Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम व जबाबदार असावी – आ. बबनराव लोणीकर

तरुण भारतbyतरुण भारत
November 12, 2025
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतूर / जालना – ग्रामपंचायत ही गावाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामपंचायत ही केवळ प्रशासनाचे केंद्र नसून ती गावाच्या विकासाची दिशा ठरवणारी संस्था आहे. गावकऱ्यांच्या सहभागातूनच खरी लोकशाही बळकट होते. लोकशाहीची खरी ताकद गावपातळीवर आहे, आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार असणे अत्यावश्यक आहे, ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची पाया रचना आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसारख्या मूलभूत सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.

मंठा तालुक्यातील हेलस (25 लक्ष), रामतीर्थ (20 लक्ष), विरगव्हाण (20 लक्ष), हनवतखेडा (20 लक्ष) या गावात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या तसेच करणावळ येथे सभामंडप (10 लक्ष), सिमेंट रस्ता (10 लक्ष) व अंगणवाडी बांधकाम (12 लक्ष) भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. गावाचा विकास ही केवळ शासनाची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे. गावातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच खरा विकास साध्य होतो. नागरिकांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा, ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात आणि विकासकामांवर लक्ष ठेवावे. गावाचा विकास हा निधीच्या प्रमाणावर नाही, तर लोकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून गावासाठी काहीतरी सकारात्मक योगदान दिले, तर गाव स्वतःच प्रगत होईल. युवकांनी रोजगार निर्मिती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या उपक्रमांत आघाडी घेतली पाहिजे. असेच आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार लोणीकर म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही चार मूलभूत क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ग्रामपंचायतींनी या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावात जर आरोग्य सुविधा चांगल्या असतील, शाळा सक्षम असतील आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असेल, तर गावाचा विकास आपोआप गती घेतो. ग्रामपंचायत ही केवळ निधी वाटप करणारी संस्था नसून ती लोकांचा विश्वास संपादन करणारी लोकशाही संस्था आहे. गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही. प्रत्येक नागरिकाने गावातील निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे, आणि ग्रामपंचायतींनी त्या सहभागाचे रूपांतर कृतीत करावे. असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतींना डिजिटल प्रशासन, पारदर्शक लेखा प्रणाली आणि शासन योजनांची अंमलबजावणी यावर भर देण्याचे आवाहन आमदार लोणीकर यांनी केले. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी त्या निधीचा योग्य वापर आणि नियोजन हे ग्रामपंचायतींच्या जबाबदारीचे आहे. गावाच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांची मते घेऊन तयार करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणावर भर देण्याची गरज आहे. गावातील महिलांच्या बचतगटांच्या कार्याची पाहणी केली आणि युवकांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे देखील आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.

गावपातळीवरील लोकशाही मजबूत करायची असेल, तर प्रशासनातील पारदर्शकता ही अत्यंत गरजेची आहे. ग्रामपंचायतींनी गावाच्या विकास आराखड्याची सर्व माहिती सार्वजनिक करावी, निधीचा उपयोग लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने मांडावा आणि निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवावा. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतींनी ऑनलाइन सेवा, ई-ग्राम योजना आणि डिजिटल हिशेब प्रणालीचा अवलंब करावा. आजच्या युगात पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाशिवाय विकासाचा वेग वाढू शकत नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमतेत वाढ करावी. ग्रामपंचायतींनी जनसहभागातून निर्णय घेण्याची संस्कृती विकसित करण्यावर भर दिला. गावातील नागरिकांनी केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे, तर दररोजच्या विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे, असे आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.

यावेळी संदीप भैया गोरे नितीन राठोड सतीशराव निर्वळ कैलासराव बोराडे शिवाजीराव जाधव विठ्ठलराव काळे नागेशराव घारे डॉ. दत्तात्रय काकडे आनंद जाधव दीपक बोराडे तोफिक कुरेशी मोहनराव आडे नितीन सरकटे शरद पाटील माऊली गोंडगे राजेभाऊ खराबे तानाजी शेंडगे रामकिसन मुसळे रामकिसन बोडखे वसंतराव बागल सुभाष बागल नारायण कणसे श्रीदेव खरात जगदीश जाधव गटविकास अधिकारी संतोष गगनबोणे रमेश वायाळ नामदेव बनसोडे कैलास चव्हाण कैलास खराबे केशव खराबे दीपकराव खराबे दगडूबा खराबे सोपानराव खराबे भगवान खराबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Post Views: 126
Previous Post

अवैध गोवंश : ५२ रेड्यांची वाहतूक, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कुऱ्हाडी येथे भव्य नागरी सत्कार व विकासकामांचे लोकार्पण सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कुऱ्हाडी येथे भव्य नागरी सत्कार व विकासकामांचे लोकार्पण सोहळा

ताज्या बातम्या

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

February 18, 2026

रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांची सदिच्छा भेट

February 18, 2026

लायन्स शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळा वार्षिक स्नेह संमेलन

February 18, 2026

तरुणाईने नात्यांकडे ‘डोळसपणे’ पाहणे काळाची गरज – मधुरा सलवारु

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685600

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697