शहरी भागात विशेषतः मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या जाणवत आहे. प्रत्येक कुटुंबाकडे एक किंवा दोन गाड्या किंवा किमान एक दुचाकी वाहन असतेच. याशिवाय सर्वसामान्य लोक लवकर घरी पोहोचण्यासाठी बस किंवा ऑटोरिक्षाचा पर्याय वापरतात, तर ओला आणि उबर यासारख्या खासगी कंपन्या प्रवाशांकडून जास्त भाडे आकारण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. अशा स्थितीत महानगरांमध्ये वाहनचालक वाढत्या ट्राफिक जाम आणि अतिरिक्त भाड्याने त्रस्त आहेत. पण बेंगळुरू येथील तीन तरुण या समस्यांशी निपटण्यासाठी एक भन्नाट आयडिया घेऊन आले आहेत.
देशातील मोठ्या शहरांमधील लोकांची ट्राफिक जामपासून सुटका व्हावी आणि स्वस्त भाडे मिळावे या उद्देशाने रॅपिडोची सुरुवात करण्यात आली होती. २०१५ मध्ये देशातील पहिली बाईक टॅक्सी रॅपिडोची सुरूवात करण्यात आली आणि मागील ३-४ वर्षात कंपनीने यशस्वी भरारी घेतली. देशातील टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये बाइक सेवेचा वापर वाढला आहे, त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे आणि कमी भाड्यात ऑफिस किंवा मार्केटपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. बाईक टॅक्सीची कल्पना, रॅपिडोने ८ वर्षात कसे यश मिळवले ते आपण खालीलप्रमाणे समजून घेऊया.
अरविंद सांका, पवन गुटुपल्ली आणि एसआर ऋषिकेश यांनी २०१५ मध्ये बेंगळुरूमध्ये रॅपिडोची सुरुवात केली होती. यापूर्वी, तिघे लॉजिस्टिक सुविधा पुरवणारा एक स्टार्टअप चालवत होते, परंतु तिघांनाही व्यवसाय क्षेत्रात हात आजमावायचा होता.
का सुरू केली बाईक टॅक्सी
२०१५ मध्ये प्रथम कॅब सेवा सुरू झाली होती, परंतु भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते. याशिवाय ट्राफिक जाममध्ये अडकण्याची देखील भीती होती. बेंगळुरू या महानगरातील ट्राफिक जाम आणि खासगी कंपन्यांच्या महागड्या भाडत्यातून ग्राहकांना सुटका देण्यासाठी त्यांना बाईक सेवेची कल्पना सुचली. सुरूवातीच्या टप्प्यात अशा जणांना संधी देण्यात आली ज्यांच्याकडे स्वतःची दुचाकी होती. लोकांनादेखील ही कल्पना पसंत पडली आणि हा प्रयोग यशस्वी झाला.
अशाप्रकारे बेंगळुरू येथे बाईक टॅक्सी सेवा रॅपिडोची सुरूवात झाली. राइड सोलो- अशी रॅपिडोची टॅगलाईन होती. यशाची व्याप्ती वाढवण्यासाठी कंपनीने ऑटो रिक्षा सुविधाही सुरू करण्यात आली, जी लोकांना खूप आवडली.
रॅपिडोने अत्यंत कमी कालावधीत कॅब सेवा देणाऱ्या ओला-उबरसारख्या कंपन्यांना टक्कर दिली. रॅपिडोने बाजारात आपली व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यावेळी कंपनीला मोठे गुंतवणूकदार मिळत नव्हते. ओला-उबरच्या कॅब सेवेसमोर बाईक सेवा टिकू शकणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. पण एप्रिल २०१६ मध्ये हिरो मोटोकॉर्पचे सीईओ पवन मुंजाल यांनी रॅपिडोमध्ये गुंतवणूक केली. मुंजाल यांनी कंपनीला टियर-२ आणि टियर-३ मध्ये आपले लक्ष वाढवण्यास सांगितले आणि याचा परिणाम म्हणजे की यामुळे कंपनीचे मूल्यांकन वाढले.