Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजकारणामध्ये संयम ठेवा यशस्वी व्हाल – राज ठाकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 9, 2024
in maharashtra
0
राजकारणामध्ये संयम ठेवा यशस्वी व्हाल – राज ठाकरे
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यशामध्ये अनेकांनी अडथळा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मी संयम ठेवल्यामुळे यशस्वी झालो आहे, असं दावा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, सध्या राज्यामध्ये अतिशय किळसवाणी राजकारण सुरू आहे आणि यातून राज्यातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी अमित ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळ नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नाशिकचे संपर्क नेते एड.किशोर शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, दिलीप दातीर, प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियाचा वापर हा कशा पद्धतीप्रमाणे करावा हे चर्चासत्र झाले. त्या चर्चासत्राचा धागा पकडून ते म्हणाले की, आज राज्याचे राजकारण अतिशय किळीसवाणं झालं आहे. कोण कुठे आहे, कोण काय करतो, हेच समजत नाही. मला दुसऱ्याचा मुल खेळवण्यामध्ये आनंद नाही, मला स्वतःचाच मुल खेळवायचा आहे आणि ते मी खेळणार, असा विश्वास देत कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले की, आज राज्यामध्ये जे चालू आहे ते चुकीच्या पद्धतीप्रमाणे चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती खुंटली आहे. आता महाराष्ट्राच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची प्रगती केली, तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण, रोजगार हा सहज उपलब्ध होऊ शकतो परंतु त्यावर कोणालाही रस नाही.

आजपर्यंत अठरा वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक चढ-उतार बघितले. विशेष करून उतार जास्त पाहिले असे सांगून पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला म्हणजे यश नक्कीच मिळतं असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत नेहमीच संयम ठेवला म्हणून प्रगती केली आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, लगेच कोणालाही यश मिळत नाही. आज भाजपा किंवा मोदी यशस्वी झाले आहेत, तर त्या पाठीमागे अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. विशेष करून आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या काही नेत्यांची मोठी तपश्चर्या आहे. 1950 मध्ये सुरू झालेला जनसंघ हा 1980 झाली भाजपा म्हणून पुढे आला. पण या तपश्चर्यानंतर आज सत्ता मिळाली आहे. ही सत्ता मिळवताना काही प्रमाणात मोदींचाही वाटा असेल, परंतु यापूर्वी जे कष्ट घेतले गेले, त्याचेच आज फळ आहे. मी पण म्हणजेच आपला पक्ष येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होईल आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे, करत राहील आणि एक दिवस यशस्वी होईल, असा विश्वास देऊन ते म्हणाले सर्वांनी संयम ठेवला आणि एक संघ राहिलं तर तो दिवस लांब नसेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीही कोणतेही आंदोलन हे अपूर्ण सोडले नाही. मनसेच्या आंदोलनाला अनेक यश मिळालेले आहेत आणि ते पूर्णपणे केलेले आहेत. परंतु विरोधक अपप्रचार करीत आहेत उलट विरोधकांनीच अनेक आंदोलन सुरू केली त्याचा शेवट घातला नाही, मध्येच ते आंदोलन अर्धवट सोडली, असा विरोधकांना चिमटा काढत आणि कोणाचे नाव न घेता राज ठाकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी यावर नागरिकांचे प्रबोधन केलं पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसेची भूमिका ही नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे असे आवाहन केले.

आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्यावरती देखील टीका केली. शरद पवार आणि अजित पवार हे सर्वांनाच उल्लू बनवत आहेत. राज्यामध्ये जे गलिच्छ राजकारण चालू आहे ते थांबविण्यासाठी आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे. देशामध्ये तीनच पक्ष खऱ्या अर्थाने काम करत आहेत. त्यामध्ये भाजप, दुसरे म्हणजे शिवसेना आणि तिसरे म्हणजे मनसे या तीन पक्षांनी देशाच्या आणि राज्याच्या भल्यासाठी काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भोग्याचा प्रश्नांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधत राज ठाकरे यांनी सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल केले काहीच कारण नव्हते आणि आता तर आमच्या हातात सत्ता आली की आम्ही लगेचच भोगे बंद करणार यात आता कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. माझा कोणत्या धर्माला विरोध आहे असे नाही पण ज्या पद्धतीप्रमाणे इतरांना त्रास होतो. त्याचा विचार कोणीतरी करावा, सरकार काय करत सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित होतं. पण सरकार देखील पळपुटं ठरलं आणि आत्ताच सरकार काहीच करायला तयार नाही. असे सांगून ते म्हणाले की मी माझ्या पक्षामध्ये जात-पात हे पाळत नाही कोणी खालचा कोणी वरचा हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला सर्वजण एकसारखे आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला वर्धापन दिवस हा मुंबई बाहेर वेगवेगळे शहरांमध्ये साजरा करत आहे. यावर्षी नाशिकमध्ये साजरा केला असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, यापुढे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे.

Post Views: 66
Previous Post

अशोक संगप्पा केंगनाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन

Next Post

पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त

पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886676

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697