पिलीव – ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ने महाराष्ट्र ,उत्तरप्रदेश, कर्नाटक तेलंगणा, झारखंड आदि राज्यातील बंद पङलेले साखर कारखाने चालु करुन विकासाला गती देण्याचे काम केले आहे .गत वर्षीच्या सिझनला उच्चांकी दर देऊन दिपावली साठी मोफत साखर देवुन सर्वांची ऊस बीले वेळेत अदा केली आहेत. 2025व 2026 या सिझनला ओंकार साखर कारखान्याने ७५ लाख टन ऊसाचे गाळप केले असुन उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली आहे. आजपर्यंत १८30 कोटी रूपये अदा केलेले आहेत तसेच वाहतुकदरांचे ७१0 कोटी रूपये दिले आहेत. या परिवारात १८हजार कामगारांची कुटुंबे या वर अवलंबून आहेत. ८ लाख शेतकऱ्यांना तारणहार हा ओंकार परिवार आहे .
माञ काही मंङळींनी जाणीवपूर्वक सोशल मिङियाच्या माध्यमातून ओंकार परिवाराची व चेअरमन यांची जाणीवपूर्वक बादनामी मानहानी सुरु केली आहे ही केवळ स्टंट बाजीसाठी व दिशाभूल करण्यासाठी ही व्यक्तव केल्याने शेतकरी ,कर्मचारीवर्ग, वाहतूकदार यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. अशया लोकांवर वेगवेळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रसिदधी पञकात म्हटले आहे .
( काही तंञीक अङचणीमुळे बीले देण्यास विलंब झाला आहे पण पुढील आठवडय़ात ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार यांची बीले अदा केली जातील येणाऱ्या सिझनला १कोटी ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचेही ओमराजे बोञे पाटील संचालक ओंकार साखर कारखाना परिवार)
यावर्षी शेतकरी व वाहतूकदारांची बिले देण्यास विलंब झाला आहे .आखाती देशातील युद्ध, बाजारात दरवर्षी प्रमाणे साखरेला मागणी नसल्यामुळे तसेच इथेनॉल बाबतचे धोरण यामुळे सर्वच साखर कारखान्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे .यामुळे बिले देण्यास थोडा विलंब झाला असल्याचे ओंकार परिवाराच्या वतीने सांगण्यात आले .

























