पंढरपूर – रोहित पवार तुम्ही अन्नत्याग केल्या सारखंवाटत नाही.. तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा सल्ला एक सर्वसामान्य महिलेने आंदोलनस्थळी रविवारी रोहित पवार यांना दिला. दरम्यान या सर्वसामान्य महिलेने दिलेल्या या सल्याचीच दिवसभर आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनीपंढरपूरात सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस आहे. आमदार पवार यांच्याआंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून तसेच विविध पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून जसा पाठिंबा मिळालया हवा तसा अजून मिळताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवारगट) पक्षाचे राज्यभरातील नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील वेळ मिळेल तसे सवडीने येथे येवून त्यांना पाठिंबा जाहीर करण्याची ओपचारिकता बजावित असल्याचे एकंदर तीन दिवसातील परिस्थितीवरुन दिसत आहे.
मात्र अशातच येथील आंदोलन स्थळी मुळचे पंढरपूर माहेर असलेली माहेरवाशीण मात्र सध्या कल्याण (मुंबई ) येथे सासर असल्याने तेथे वास्तव्यास असलेली एक महिला अचानक अवतरली. यावेळी तिने आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधत आपण अन्नत्याग केल्या सारखे वाटत नाहीत असे म्हणत तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा सल्ला देखील द्यायला ती महिला विसरलीनाही. तुम्ही सरकार आणू शकताय. त्यासाठी प्रयत्न करा. अन्नत्याग करुन काही उपयोग नाही.अन्नत्याग बंद करा. शेतकऱ्याला सारखी कर्जमाफी देवून सवय लावू नका. त्यासाठी एकदाचसरकार आणा कर्जमाफी द्या. मी कुठल्या पक्षाची नाही. सर्वसामान्य महिला नागरिक आहे अशीदेखील ती महिला रोहित पवार यांना म्हणाली.त्यामुळे आंदोलनस्थली महिलेने दिलेल्या यासल्यांचीच दिवसभर चर्चा रंगलेली दिसत होती.
———————
चौकट : (रोहित पवार हे सरकारची आडवणूक करता आहेत )
दरम्यान रोहित पवारांशी संवाद साधण्यापूर्वी पत्रकारांशी बोलतानाती महिला म्हणाली आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही आहोत. अधिक महिना असल्यामुळे मी दर्शनाला आलेली आहे.चांगले ठणठणीत छान दिसता आहेत राहित पवार. त्यांनी अन्नत्याग केला आहे असे मला अजिबात वाटत नाही. त्यांच्यामुळे सरकारची आडवणूक होते आहे. शेतकऱ्यांना मदत जरुर केली पाहिजे पण त्यांना ती सारखी सारखी सवय देखील लागली नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळी त्याच त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देवूच शकत नाही. अगोदर तर सरकार आर्थिक अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत हे आंदोलन करीत आहेत हे चुकीचे आहे. रोहित पवार हे सरकारचीआडवणूक करता आहेत.
———————–
चौकट : ( दीडशे रुपये लिटर
अल्कालाईन पाणी घेताहेत रोहित पवार )
दरम्यान रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आज तीन दिवसहोता आहेत. येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आमदार रोहित पवार यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करीत आहेत. त्यांचे शुगर व बीपी नाँर्मल असल्याची डाँक्टरांनी माहिती दिली. दरम्यान शनिवारी रात्री शुगर ९४ तर रविवारी दुपारी १२ वाजे पर्यंत १०१ होती.त्यामुळे अल्कालाईन पाण्यामुळे शुगर नाँर्मल राहते असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जाते आहे.
———————–
चौकट : ( पवारां बरोबर यांचा देखील आंदोलनात आहे सहभाग )
दरम्यान विकास लवांडे (पुणे), राहुल अरुण कौलगेपाटील (पंढरपूर),मोहित बाळासाहेब गायकवाड (सोलापूर), सुरेश वैजिनाथ परकड (पुणे), दिलीप गंगाधर रायभोगे(धाराशिव), सुरज गजानन साठे (बुलढाणा), महादेव तळेकर ( पंढरपूर), रमेश यशवंत जाधव(हिंगोली), जितेंद्र रावसाहेब फराटे (नगर), सम्राट डोंगरदिवे (अकोला), विजय कोपनर(नगर), समाधान देशमुख महाराज ( पुणे), हनुमंत भोसले (नगर), पल्लवी पाटील (सोलापूर),हेमंत काळे (नगर), कविता म्हात्रे (सातारा), रमेश जाधव (बीड) आदींनी आमदार रोहित पवारयांच्या बरोबर १२ जून पासून अन्नत्याग आंदोलन येथे सुरु केले आहे.
Post Views: 9