अयोध्येत ‘श्री राममंदिर’ (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे. अयोध्येच मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरु आहेत. दरम्यान, सध्या लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, त्या दिवशी ‘श्री रामजन्मभूमी मंदिर’चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. लोक याकडे प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणूनही पाहत आहेत. पण खर्या अर्थाने केवळ श्रीरामच ‘राममंदिरात परतणार नाहीत, तर याचबरोबर अयोध्येत 85,000 कोटी रुपये येणार आहेत. नेमकी संपूर्ण योजना काय? ते सविस्तर पाहुयात.
धार्मिक पर्यटनाला चालना
अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
अयोध्येत विकासाची नवी गाथा
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नवीन रेल्वे स्टेशन
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा



















