Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन विधी सेवा देणे काळाची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
March 1, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर व्हावी,यासाठी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली असून ती यशस्वी करण्यासाठी लोकांना त्यांचे अधिकार, हक्क माहित असणे गरजेचे आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, त्याकरिता कायद्याचे ज्ञान देण्याबरोबरच सर्व् शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा म्हणजेच महाशिबीर या उपक्रमांचे आयोजन केले असून विधी सेवा देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील सोलापूर जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार यांनी केले.

   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी वडाळा येथील माऊली महाविद्यालयात महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबीराचे उद्घाटन न्यायमूर्ती जमादार व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती जमादार बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा सत्र् न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. 

     न्यायमूर्ती जमादार पुढे म्हणाले, न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी घटनेला अभिप्रेत असलेले विधी सेवा प्राधिकरण 1987 साली सुरु झाले तेव्हा फक्त गरीबांना त्यांचे न्यायालयातील तंटे चालविण्यासाठी वकील उपलब्ध करुन देणे एवढेच काम होते. मात्र, यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता दूर होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हक्क व अधिकाराबद्दल ज्ञान देण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला.त्यानंतर सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य, ही प्रजासत्ताक राज्याची संकल्पना यशस्वी करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लोककल्याणासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे पोहोचल्या  पाहिजे, या उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणाचा महाशिबीर हा तिसरा टप्पा सुरु झाला असून केवळ योजनेसाठी आर्थिक तरतूद करुन उद्देश साध्य होणार नाही. तर  प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, हा विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे. 

  न्यायमूर्ती पुनीवाला म्हणाले, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच गरीबातल्या गरिबांना सहज न्याय मिळावा, हे महात्मा गांधींना अभिप्रेत होते.महात्मा गांधींचे न्याय व्यवस्थेबद्दलचे विचार सत्य व सामाजिक समतेवर आधारित होते. याच विचाराने विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज सुरु असून जर आपल्याकडे चांगली न्याय वितरण प्रणाली असेल तर लोकशाही मजबूत होईल जी आपल्या देशाची प्रगती करण्यास मदत करेल. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेऊन सर्वसामान्य घटकापर्यंत न्याय, त्यांचे हक्क व अधिकार याची जाणीव करुन दिली जात आहे.लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. आम्हाला अशा कायदेशीर सेवेबद्दल खूप आनंद आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमाला साथ देतील,अशी आम्हाला आशा वाटते.“ 

    केवळ न्यायापुरते मर्यादीत न राहता शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रजासत्ताक ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सार्थ ठरावी, हा विधी सेवा प्राधिकरणाचा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी प्रास्तविकातून सांगितले. सोलापुरातील एन.ए.बी. अंधकार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले, शहर व जिल्हा पोलीस यंत्रणेतील बँन्ड पथकाने न्यायमूर्ती व मान्यवरांचे स्वागत केले.सोलापूर येथील करुणाशील समितीचे अशुतोष नाटकर आणि कलाकारांनी बालविवाह विरोधी जनजागरण व घर दोघांचे हे दोन पथनाट्य सादर केले.न्यायाधीश अश्विनी बिराजदार व न्यायाधीश वैष्णवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी आभार मानले.

चौकट 

दृष्टिक्षेपात महाशिबीर

महाशिबीरात विविध शासकीय यंत्रणांचे 40 स्टॅाल होते.

सर्व शासकीय विभागांचा सहभाग

सुमारे सहा हजार लोकांची उपस्थिती

मूळचे अक्कलकोटचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती जमादार यांनी न्यायमूर्ती पुनीवाला यांची परवानगी घेऊन मराठीमध्ये भाषण करीत असल्याचा खुलासा केल्यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांची उत्फूर्द दाद

कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथराव मुंढे शेतकरी अपघात योजना, समाज कल्याण विभाग, ओ.बी.सी.महामंडळा्च्या लाभार्थींना प्रातिनीधीक स्वरुपात न्यायमूर्तींच्या हस्ते योजनेच्या लाभाचे वितरण 

दोन ठिकाणी चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना न्यायमूर्ती पुनीवाला व न्यायमूर्ती जमादार यांच्या हस्ते सुफूर्द करण्यात आला.

दोन्ही न्यायमूर्तींनी सर्व 40 स्टॅालला भेटी देऊन त्या त्या विभागाच्या कामकाजाची माहिती व सामान्य जनतेशी हितगूज केले. काही स्टॅालवर त्या विभागाच्या लाभार्थिंना लाभाचे वितरणही केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर  व त्यांच्या सहका-यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन केले होते.

फोटो ओळी – फोटो 1 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात वृद्ध महिलेची अपुलकीने विचारपूस करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

फोटो 2  जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात भूमी अभिलेख खात्याच्या कामकाजाची माहिती घेताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला,त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

 फोटो 3 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागांच्या 40 स्टॅालचे उद्घाटन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव

फोटो 4 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्याला मदत वाटप करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला

Post Views: 106
Previous Post

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

Next Post

पाटील आत्महत्या प्रकरणात अभिषेक कोरेला चार दिवस पोलीस कोठडी. #public #solapurnews #marathinews

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पाटील आत्महत्या प्रकरणात अभिषेक कोरेला चार दिवस पोलीस कोठडी. #public #solapurnews #marathinews

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1000794

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!