
पंढरपूर – जेव्हा नव्हते चराचरा, तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हतीगोदा,गंगा, तेव्हा होती चंद्रभागा..अर्थात
तिर्थक्षेत्र पंढरपूर आणि येथील माता चंद्रभागेचे अस्तित्वसंतमाहात्मांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या अभंगातून अधोरिखीत करुन ठेवले आहे. जेव्हा चराचर नव्हते तेव्हा तिर्थक्षेत्र पंढरपूर अस्तित्वात होते. या बरोबरच जेव्हा गोदा,गंगा या सारख्या मोठ्या नद्या प्रवाहित नव्हता त्या अगोदर पासून पंढरपूरात चंद्रभागानदी पंढरपूरात प्रवाहित होती. त्यामुळे या पवित्र चंद्रभागेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी केवळ शासनाची, मंदिर समितीची आणि पालिकेची नाही तर ती सर्वांचीच आहे. त्यामुळेच सर्वसामान्यभाविकांनी आपल्या पंढरपूरातील वास्तव्यात सैदेव जागरुकता दाखवून चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर आणि तरच पवित्र चंद्रभागा नदी निखळ,निरंतर आणि खळखळून प्रवाहित राहु शकणार किंवा वाहू शकणार आहे.
दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास सध्या सुरु झालेला आहे. अधिकमास सुरु होवून साधारणपणे १२ ते १५ दिवस होत आलेले आहेत. या काळात अधिक मासाच्या प्रत्येकदिवशी भाविकांची गर्दी वाढत चाललेली दिसत आहे. साधारणपणे अजून देखील अधिक मासाचे शेवटचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे या काळात देखील गर्दीचे उच्चांक होणार आहेत.
साधारणपणे येथे आलेला भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करतो. त्यानंतर विठुरायाच्या दर्शनाला जात असतो. अनेक भाविक चंद्रभागेच्या वाळवंटात थोडाफार विसावा देखील घेत असतात. चंद्रभागा स्नान, हरिपाठ तसेच नित्यक्रम पुजापाठा नंतर गावाकडून बरोबर आणलेल्या शिदोऱ्या देखील चंद्रभागेच्या वाळवंटातच भाविकांकडून सोडल्या जातात. आधी पोटोबा,मग विठोबाहे सवडीचे व्रत आचरणात आणून मस्तपैकी त्याफस्त करुन भाविक पंढरीतील नगरप्रदक्षिणा, देवाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन. अगदी फारचघाईगडबड असेल तर नामदेवपायरीचे दर्शन किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कळस दर्शन करुन पंढरीचा मुक्काम संपुष्टात आणित पुन्हा परतीच्या प्रवासासाठी गावाची वाट धरीत असतात.
मात्र हे सर्व करीत असताना पवित्र चंद्रभागा नदीच्या तसेच तिच्याविर्स्तण पसरलेल्या वाळवंटाच्या पावित्र्याकडे मात्र भाविकांचे पुर्ण दुर्लक्ष होत असते. कारण भाविकांकडून वाळवंटात ( तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था असताना देखील) अनेक वेळा उघड्यावरच प्रातविर्धी उरकल्याचे दिसून येतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीपसरते. या बरोबरच गावाकडून येताना भाविकांकडून सर्रास घरातील निर्माल्य,देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील मुर्ती, जुन्या फोटोफ्रेम, देवदेवतांची जुनी वस्त्रेपवित्र् चंद्रभागा नदी मध्ये सोडण्यासाठी खास आणली जातात. तसेच या ठिकाणी देखील चंद्रभागेला अर्पण करण्यासाठी भाविकांकडून (खास करुन महिला भाविकांकडून) दीपदान, चंद्रभागा नदीलाखणानारळाची ओटी असे विधी देखील सर्रास पार पाडले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे यासर्व प्रकारामुळे चंद्रभागा नदीपात्राचे पावित्र्य धोक्यात येते. पात्रात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन येते. त्यामुळे चंद्रभागा नदी, तिचे विस्तीर्ण वाळवंट अपवित्र किंवा घाण होण्याला खरोखरं जबाबदार कोण असा सवाल जर उपस्थित केला तर आपण सर्रास बोट दाखवितो ते शासन, नगरपालिका आणि मंदिर समितीकडे. मात्र येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपल्या मनाला जर हा प्रश्न केला तर त्याचे उत्तर आपोआपच भाविकाला मिळू शकते. कारण खरोखर चंद्रभागानदीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही केवळ शासनाची, पालिकेची आणि मंदिर समितीची नाही. कारण त्यांच्याकडून केवळ स्वच्छेतेच्या व्यवस्था निर्माण केल्या जातात.
कारण जसा अधिक महिना सुरु झाला तेव्हा पासुन येथील नगरपालिका वारंवार नदीची,वाळवंटाची स्वच्छता करताना दिसून येते. मात्र येणाऱ्या भाविकांच्या मानाने ही यंत्रणा अतिशय तोकडी पडताना दिसू येते. कारण घाण करणाऱ्यांची संख्या लाखावर आणि स्वच्छकरणाऱ्या हातांची संख्या पन्नाश, शंभरावर .. येथे येणाऱ्या भाविकांचा राबता पाहिला आणि त्यांच्याकडून कळत नकळतहोणाऱ्या घाणीचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे
प्रत्येकभाविकांनी स्वत:शी ठाम निश्चिय करुन आपल्या स्वत:च्या घरा प्रमाणेच पंढरीनगरी मध्येतसेच विशेषत: चंद्रभागा नदी, तिचे विस्तीर्ण वाळवंट स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केलातर आणि तरच चंद्रभागा नदीचे पावित्र्य खऱ्या अर्थाने जपले जाईल. माता चंद्रभागा खऱ्याअर्थाने नितळ, स्वच्छ आणि प्रवाहितपणे वाहू शकणार आहे. अन्यथा आपणच चंद्रभागेला अपवित्रकरण्यास जबाबदार असणार आहोत. केवळ विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनाने आपल्या पदरात
पुण्य पडणार नाहीतर तिर्थक्षेत्र पंढरपूर, मंदिर परिसर, चंद्रभागा नदी आणि तिचे विर्स्तीर्ण वाळवंटांचीस्वच्छता तिचे पावित्र जपले तर आणि तरच आपल्या पदरात पुण्यफल पडणार आहे हे प्रत्येकभाविकाने मनाशी ठरविले पाहिजे.























