सोलापूर- मेरठ दंगलीत बशीर बद्र यांची सर्व पुस्तके जाळण्यात आली. विशाल भारद्वाज यांनी त्यातील ४५०० कविता तोंडपाठ केल्या होत्या, ज्या त्यांनी बशीर बद्र यांना उद्देशून लिहिल्या. जिथे जातीयवाद्यांनी दुष्टता आणि ढोंगीपणा दाखवला, तिथे विशाल भारद्वाज यांनी राष्ट्रीय ऐक्य आणि मानवतेचे उदाहरण घालून दिले. सोलापूरचे प्रख्यात मराठी कवी, समीक्षक हेमकिरण पतकी यांनी सोलापूर उर्दू घर येथे आयोजित बशीर बद्र यांच्या शोकसभेच्या अध्यक्षीय भाषणात हे विचार व्यक्त केले. त्यांनी बशीर बद्र यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वावर आणि बौद्धिक पैलूंवर प्रकाश टाकला आणि पुढे म्हणाले, त्यांच्या शब्दांमधून जीवनातील सत्य, प्रेमाच्या सूक्ष्म भावना आणि सामाजिक जाणीव प्रतिबिंबित होते. त्यांचे साहित्यिक भांडवल येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रकाशस्तंभ आहे.
प्रख्यात कवी बशीर बद्र यांच्या स्मरणार्थ सोलापूर उर्दू घरतर्फे ‘यादे बशीर बद्र’ यांच्या ‘नज़म व गझल ख्वानी’ या साहित्यिक आणि शोकसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदस्य प्रा.डॉ. शफी चोपदार यांनी सोलापूर उर्दू घरचा संक्षिप्त आणि सर्वसमावेशक परिचय देताना म्हणाले की, बशीर बद्र यांच्या स्मरणार्थ २८ आणि २९ जून रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला जात आहे. या परिसंवादासाठी आतापर्यंत देश-विदेशातून ९१ शोधनिबंध सादर झाले आहेत.
या कार्यक्रमाची ओळख सदस्य डॉ. हारूनरशीद बागबान यांनी करून दिली तर सभेचे अध्यक्ष हेमकिरण पतकी यांचा परिचय डॉ. शफी चोबदार यांनी करून दिला. त्यानंतर ग्रंथपाल साहिर नदाफ यांनी पुष्पगुच्छ देऊन पतकी यांचे स्वागत केले. यावेळी हाजी के. बी. नदाफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गज़ल ख्वानीमध्ये, सोलापूर उर्दू घरच्या गैर-उर्दू भाषिकांसाठी असलेल्या उर्दू वर्गातील विद्यार्थ्यांनी व हेमंत कुलकर्णी, धनंजय गोडबोले, रेशमान जामदार, डॉ. आसिफ इक्बाल, अब्दुल मजीद शेख आणि मुहम्मद अयाज यांनी निवडक कविता सादर करून बशीर बद्र यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला राजाराजेश चंद्र, राजा बागबान, मतीन वालसिंगकर, करीम शेख, इसाक बाटघर, बशीर बागबान, सोहेल शेख, अख्तर शेख आदी उपस्थित होते. सूत्रतसचांलन डॉ. सुमय्या बागबान यांनी तर आभार डॉ. शफी चोपदार यांनी मानले.


















