सोलापूर – विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी अनेक कारण असताना, दुसरे कारण देखील तितकेच महत्त्वाचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे राजाभाऊ राऊत यांचे खंदे समर्थक मानले जातात. ज्या नेत्याने आपल्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. त्या नेत्याला आपल्या जिल्ह्याचा आमदार बनवणे, ही खुणगाठ अध्यक्ष वैद्य यांनी आपल्या मनाशी बांधली होती. आता नाही तर कधी नाही अशी भूमिका घेत, आपल्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी सच्चा कार्यकर्ता कामाला लागला होता. रात्रंदिवस फोनाफोनी गाठीभेटी सुरू झाल्या होत्या.
यादरम्यान भगवंत महोत्सव सुरू झाला.
भगवंत महोत्सवाला मुख्यमंत्र्यांना बार्शीत आणायचे ही खुणगाठ मनाशी बांधून राजाभाऊ राऊत यांनी कामकाज सुरू केले. त्यांच्या जोडीला अध्यक्ष वैद्य हे देखील सावलीप्रमाणे होते. विधान परिषदेची नुकतीच चर्चा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष वैद्य आणि तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांना आपला नेता जिल्ह्याचा आमदार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली गेली. मग काय त्यासाठी अध्यक्षांनी तरुण कार्यकर्त्यांसह अनुभवी ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन आपल्या नेत्याला उमेदवारी मिळवण्यासाठी व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली.
राजेंद्र राऊत यांना विश्वासात घेऊन अध्यक्ष वैद्य तसेच त्यांचे स्वीयसहाय्यक जयसिंग परदेशी यांनी देखील हालचाली सुरू केल्या. उमेदवारीसाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संपर्क साधण्यास सुरुवात झाली. विशेषतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणे त्यांना विश्वासात घेणे हे देखील महत्त्वाचे कार्य या मंडळींनी पार पाडले. त्याचे फलित म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनावर एक वेगळे प्रकारे छाप पाडणे होती. यासाठी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली. राजाभाऊ असेल तर आमची काय हरकत नाही.. जणू काही हिरवा कंदीलच या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी दिला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार असताना राजेंद्र राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य केले होते. त्यानंतर त्यांची जवळीक्ता आणखीन वाढत गेली. याशिवाय मराठा आरक्षणा दरम्यान जरांगे यांना अंगावर घेणे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरशी झाल्यानंतर बार्शीपासून ते सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करणे. या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर छाप सोडणाऱ्या होत्या. त्याचे फलित म्हणून अखेर परिचारक यांना तूर्तास बाजूला ठेवून खंदे समर्थक म्हटल्या जाणाऱ्या राजेंद्र राऊत यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
चौकट
सोलापूर विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजप पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली होती. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना यापूर्वी भाजपच्या श्रेष्ठींनी उमेदवारी देण्यासंबंधी सकारात्मक विचार केला होता. परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २०२४ मधील आंदोलनात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यावेळी बार्शीचे तत्कालीन आ. राजेंद्र राऊत यांनी फडणवीस यांच्या बाजूने भूमिका घेत जरांगेंवर टीका केली होती. परंतु या गोष्टीमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु सर्व समाजाला धुडकावून मनोज जरांगे तसेच मराठा बांधवांना अंगार घेतले होते. त्यामुळेच राऊत यांनी गेल्या काही वर्षातील छाप सोडलेल्या कामांमुळे ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
चौकट
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यशामुळे उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही माजी आ. राऊत यांनी बार्शी बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत विधान परिषद निवडणुकीसाठी संधी दिली आहे. त्याच पद्धतीने आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पुत्राला झेडपीचे अध्यक्ष बनवले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे काम केले. यामुळे आम्ही देखील आमच्या नेत्याला विधान परिषदेचे उमेदवारी मिळवण्यासाठी बार्शी ते मुंबई असा प्रयत्न केला.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 14