मा मंत्री आ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चा ===
अशोक तनपुरे
वाटुर प्रतिनिधी अयाज पठाण
वाटुर = प्रहार संघटनेचे संस्थापक व दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष मुंबई तथा मा. मंत्री आ. बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली
छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर दिव्यांग आक्रोश मोर्चाचे आयोजन दिनांक 9 / 8 /2024 दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी केले दिव्यांगाच्या मागण्या खालील प्रमाणे
1 दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन लागू करावी
2 बेघर दिव्यांगांना एक गुंठा जागा देण्यात यावी
3 ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यामध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावे
4 सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा
5 दिव्यांगांना पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्या
6 दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात यावी
7 दिव्यांगांना विनाआट घरकुल देण्यात यावे
8 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र
देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी
9 दिव्यांगासाठी दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढावी
अशा दिव्यांगाच्या अनेक प्रश्नांवर मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बंधू-भगिनींनी दिव्यांग आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अभी नही तो कभी नही असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी पत्रकामध्ये अशी माहिती दिली आहे
स्थळ = विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर
दिनांक= 9 / 8 / 2024 रोजी शुक्रवार वेळ सकाळी 11 वाजता ====================