भोकरदन : मागील अनेक वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांनाच गट समन्वयक,शालार्थ समन्वयक,लिपिक वर्गीय कामासाठी जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती कार्यालयामध्ये पूर्णवेळ अनेक शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या केलेल्या होत्या.यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी विभागीय आयुक्त तसेच शिक्षणमंत्र्याकडे केली होती.तसेच गत वर्षी अनेक आंदोलने,उपोषणे करून विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले होते.त्यानंतर विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना सर्व नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर 15 एप्रिल रोजी कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्याचे पत्र सिइिओ वर्षा मीना यांनी काढले होते.मात्र मागील महिन्यात 5 जुलै रोजी पुन्हा 10 शिक्षकांना शालार्थ प्रणाली व सेवार्थ प्रणालीसह सरल प्रणाली पवित्र पोर्टल व आस्थापना विषयक संगणकीय कामांची पूर्णवेळ जबाबदारी देण्याचा आदेश सि ई ओ वर्षा मीना यांनी काढला होता.यामुळं सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी मागील महिन्यात भोकरदन येथील शिक्षण विभागासमोर पाच दिवस भरपावसात बैलगाडीत बसून उपोषण केले होते तसेच मागील आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालय समोर दोन दिवस उपोषण करून शिक्षकांना लिपिकवर्गीय कामे न देता फक्त अदयापणाचे कार्य करू द्यावे व विध्यार्थ्यांच्या नुकसान थांबवावे अशी मागणी केली होती.तसेंच मंत्रालयात प्रधान ग्रामविकास सचिव व प्रधान शिक्षण सचिवाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.
याची विभागीय आयुक्तांनी दखल घेत सिईओ वर्षा मीना यांना तात्काळ कार्यालयीन कामासाठी केलेल्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.त्याची दखल घेत सोमवारी सिईओ वर्षा मीना यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी यांना आदेशाचे पत्र काढून सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना मूळ पदस्थापने वर पाठविण्याचे आदेश दिले.या पत्रामध्ये म्हटले आहे की शालार्थ प्रणाली व सेवार्थ प्रणालीसह सरल प्रणाली,पवित्र पोर्टल व आस्थापना विषयक संगणकीय कामांची जबाबदारी दिलेल्या शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव मान्यतेत्सव सादर केलेला होता मात्र या प्रस्तावास विभागीय आयुक्तांकडून मान्यता प्राप्त न झाल्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात येत आहे.प्रतिनियुक्त्या केलेल्या शिक्षकांना तात्काळ मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू करून घ्यावे व तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश वर्षा मीना यांनी दिले.
यामध्ये किशोर चव्हाण,नरेंद्र पाटील,उद्धव बिल्हारे,अशोक नाकाडे, दत्तात्रय पौळ,सदाशिव तोटे,संजय महाजन,विजयसिंग बिसेन,संतोष पिंपळे,संतोष पवार या दहा शिक्षकांना तात्काळ शाळेवर रुजू होण्याचे आदेश सिईओ वर्षा मीना यांनी दिले.
या आदेशामुळे वर्षानुवर्षे कार्यालयात ठाण मांडून बसणाऱ्या शिक्षकांचे चांगलेच धाबे दनानले असल्याची चर्चा पालकामंधून होत आहे.दीड महिन्यातच सिईओ वर्षा मीना यांनी काढलेला आदेश पुन्हा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आल्याची चर्चा देखील होत आहे.
प्रतिक्रिया
कार्यालयीन कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करता येत नाही यासाठी आम्ही पालकांच्या वतीने विध्यार्थ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने,उपोषणे केलीत.मात्र जिल्हा परिषद प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत होते.आम्ही आवाज उठवितो म्हणून खोटे गुन्हे दाखल करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला मात्र खोट ते खोटच असतं हे आज सिद्ध झालं. अखेर नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जाणीवपूर्वक कायद्याचा भंग करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करावी.तसेच लिपिकाचे कामे करून शिक्षकाचे वेतन घेणाऱ्यांचे देखील वेतन कपात करण्यात यावे.
नारायण लोखंडे – उपोषणकर्ते