Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तपास भरकटला: अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात आ. बबनराव लोणीकरांचा सणसणीत हल्ला

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना / अंबड – दि 9 नोव्हेंबर जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात भाजपाचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. हा घोटाळा प्रकरणातील तपास पूर्णपणे भरकटला असून पोलिसांना सर्व आरोपींचे पत्ते माहीत असतानाही त्यांना अटक करण्यात येत नाही असे सांगत लोणीकर यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तत्कालीन आरडीसी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अंबड तहसीलदार आणि घनसावंगी तहसीलदार यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झालेले नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोपींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत त्यांची संपत्ती जप्त करावी आणि झालेल्या अपहाराची संपूर्ण रक्कम वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली असून ही मागणी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात जोरदारपणे मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमावे अशी मागणीही ते लावून धरणार असून लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

घोटाळ्याचा पर्दाफाश आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रयत्नांतूनच

हा संपूर्ण अनुदान घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश आमदार बबनराव लोणीकर यांच्या खास आणि सततच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाला असून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला माफ करणार नसल्याचा स्पष्ट आणि कठोर निर्वाळा त्यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांत जालना जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यासाठी शासनाच्या चार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र महसूल कृषी आणि पंचायत विभागातील काही बेईमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट खोटी कागदपत्रे आणि शेतकऱ्यांच्या नावाने दुबार अनुदान तयार करून ही रक्कम स्वतःच्या खिशात घातली. चौकशी समितीच्या अहवालानुसार एकट्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातच सुमारे सत्तर कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला असून जिल्ह्याच्या इतर भागांचा विचार केला तर हा आकडा शंभर कोटींच्या आसपास जातो असे लोणीकर यांनी यापूर्वीच सांगितले होते.

सात आरोपींना अटक झाली असली तरी एकवीस जण अद्याप फरार

आतापर्यंत या प्रकरणात सुमारे सात आरोपींना अटक झाली असली तरी एकवीस जण अद्याप फरार आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगत आहेत. मात्र लोणीकर यांच्या मते हा तपास जाणीवपूर्वक मंदावला जात असून प्रमुख सूत्रधारांना वाचवले जात आहे. तत्कालीन तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांची नावे चौकशीत समोर आली असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत असा सवाल उपस्थित करत लोणीकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि आता थेट विधानसभेत हा विषय उचलून धरणार असल्याने सरकारला या प्रकरणात तातडीने कारवाई करावी लागणार आहे.

शेतकरी संघटना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीही या घोटाळ्याची सीबीआय किंवा एसआयटी चौकशी करण्याची मागणी वारंवार केली आहे कारण खरे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले तर भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटले. आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच आवाज उचलला असून गेल्या पस्तीस वर्षांपासून ते शेतकरी हितासाठी झटत आहेत असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून आमदार बबनराव लोणीकरांच्या पुढाकाराने न्याय मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. हिवाळी अधिवेशनात हा विषय ऐरणीवर आल्यानंतर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण हा केवळ जालना जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराचा एक मोठा उदाहरण ठरला आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या प्रत्येक पैशाची वसुली होईपर्यंत आणि सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत. जालना जिल्ह्यातील शेतकरी या नेत्याच्या पाठीशी उभे राहतील अशी भावना व्यक्त होत आहे.

Post Views: 158
Previous Post

केदारखेडा येथे बहुजन समाज चिंतन बैठक

Next Post

युवा उधोजग असलम सय्यद यांना ईगल फाऊंडेशनचा पुरस्कार प्रदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युवा उधोजग असलम सय्यद यांना ईगल फाऊंडेशनचा पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915371

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697