पिलीव – जिल्ह्य परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानलो जातो .माञ या गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रणजितसिंह जाधव यांचा पराभव करीत भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी या जिल्ह्य परिषद गटात नवीन इतिहास रचला आहे .खरेतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील अंतर्गत गटबाजीचा फटका व निष्ठावंत कार्यकलतयांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला चांगलेच महागाईत पडले आहे.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.खरेतर या पिलीव जिल्ह्य परिषद गटातून भाजपकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास अनेकजण ईच्छुक होते .माञ भाजपने अनेकजण उमेदवारी मागत असताना मळोली येथील चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली .ही उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीकडून मळोली येथील माजी सरपंच तसेच माजी पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव यांना उमेदवारी निश्चित केली .
रणजितसिंह जाधव यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते एक तगडे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते.यामधये भाजपचे चंद्रकांत जाधव यांना पिलीव, बचेरी, सुळेवाडी, मळोली,तांदुळवाडी, साळमुखवाडी या गावातून चांगले मताधिक्य मिळाले.तर विरोधी उमेदवार रणजितसिंह जाधव यांना शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, काळमवाडी या गावातून चांगले मताधिक्य मिळाले.
यामध्ये चंद्रकांत जाधव यांना 12903 तर रणजितसिंह जाधव यांना 12256 मते मिळाली यामध्ये चंद्रकांत जाधव 647 मतांच्या फरकाने विजय मिळविला. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ल्यात कमळ फुलले .तर पिलीव पंचायत समिती गणातही भाजपच्या नम्रता पुकळे यांनी सोलापूर जिल्ह्य परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या पत्नी यज्ञासेन जहागिरदार 435 मतांच्या फरकाने दैदीप्यमान विजय मिळविला .तर तांदुळवाडी पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मनिषा पाटील यांनी भाजपच्या वैशाली फुलारे यांच्यावर 30 मतांनी विजय मिळविला .
पिलीव जिल्ह्य परिषद गटात तसेच संपुर्ण माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व उत्तमराव जानकर गट एकत्र असताना याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रणजितसिंह जाधव यांचा तर पिलीव पंचायत समिती गणातुन यज्ञासेन जहागिरदार यांचा झालेला पराभव हा धक्कादायक मानला जात आहे .तर हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे माजी सदस्य गणेश पाटील, पिलीवचे माजी लोकनियुक्त सरपंच नितीन मोहीते , पिलीवसह ,बचेरी ,शिंगोर्णी, काळमवाडी, कोळेगाव, तांदुळवाडी येथील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केलयाचा भाजपला मोठा फायदा या निवडणुकीत झाला.पिलीव गावावर माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांचे वर्चस्व आहे त्यातच या निवडणुकीत त्यांना कट्टर स्थानिक पातळीवरील विरोधी नागरी आघाडीची साथ असताना जिल्ह्य परिषदेचे उमेदवार व पंचायत समितीच्या उमेदवाराचा झालेला पराभव निश्चितच आत्मचिंतन करायला लावणारा आहे .तर भाजपसाठी हा विजय दिलासादायक असुन आगामी पिलीव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपा, जहागिरदार पार्टी व नागरी आघाडी यामध्ये जोरदार लढत होण्याचे स्पष्ट संकेत या निवडणुकीतच मिळाले आहेत.





















