वेळापूर – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पं. स. निवडणूक निकालानंतर काही निकाल लक्षात रहाणारे व राजकीय सामाजिक घडामोडी वर विचार करायला लावणारा निकाल म्हणजे वेळापूर जिल्हा परिषद निवडणुकीत सौ मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा दणदणीत झालेला विजय हा माळशिरस तालुक्यात चर्चेत राहिलेला निकाल मानला जातो.
कारण या वेळापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही संपूर्ण वेळापूर गटात जनतेने व संपूर्ण आरपीआयचे नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष शिवसेना उबाठा, शेतकरी संघटना पक्ष, प्रहार संघटना व इतर अनेक लहान मोठ्या संघटनांनी एकमुखी सशर्त पाठिंबा दिल्यामुळे सौ मिनाक्षी सरतापे यांचा विजय झाला आहे .
वास्तविक पाहता केंद्रात राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची भाजप बरोबर गेल्या आठ वर्षांपासून युती आहे मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले असले तरी त्यांच्या पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना निवडणुकीत कुठेही स्थान दिले जात नाही निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा वाटपात कुठेही सामावुन घेतले जात नाही स्थानिक स्वराज्य संस्था असो लोकसभा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आठवले पक्षाला निवडणुकीत वापरून घेतले जाते पण सत्तेची, लाभाची पद दिली जात नाहीत. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आता पर्यंत कार्यकर्ते नेते भाजपला निवडणुकीत सहकार्य मदत करत आलेले आहेत. भाजपकडे रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत योग्य न्याय जागा मिळाल्या पाहिजेत ही माफक अपेक्षा असताना भाजप केवळ वापरा व बाजूला ठेवा या भुमिकेत राहिली आहे त्यामुळे या सर्वांचा परिपाक असा झाला की राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे नेत्यांत कार्यकर्त्यां मध्ये प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली ही बाब रामदास आठवले यांनी भाजपचे वरिष्ठ सुत्रांकडे वारंवार कळवूनही भाजपने कसलीही दाद दिली नाही. त्यामुळे चिडलेल्या व नाराज असलेल्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आरपीआयचे वरिष्ठांना कळवून भाजपला निवडणुकीत सहकार्य करायचे नाही व जो समविचारी पक्ष निवडणुकीत योग्य न्याय देऊन जागा देईल त्या पक्षा बरोबर स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवल्या त्याचा चांगला परिणाम व फायदा झाल्याचे चित्र पहायला मिळालं
यानिमित्ताने रिपब्लिकन ऐक्याचे दर्शन पाहायला मिळालं महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी भाजपचे विरोधात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी आघाडी करून निवडणूक लढवल्या व यश संपादन केले आहे. माळशिरस तालुक्यात त्याचाच परिणाम म्हणून वेळापूर जिल्हा परिषद गटात आरपीआयचे सर्व नेते कार्यकर्ते मोठ्या हिमतीने ताकदीने एकवटले तसेच आरपीआयचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचा मोठा जनसंपर्क विनम्र स्वभाव तसेच सर्व जाती धर्मातील बहुजन समाजांतील सर्वांशी असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध तसेच वेळापूर पंचक्रोशीतील सामाजिक प्रश्न नागरीसुविधा मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न यामुळे मिलिंद सरतापे यांच्या सौभाग्यवती मिनाक्षी सरतापे यांना वेळापूर जिल्हा परिषद गटात उमेदवारी द्यावी म्हणून सर्वानुमते पसंती मिळाली आणि या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिररसचे आमदार उत्तमराव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आरपीआयचे नेते कार्यकर्ते यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे वेळापूर जिल्हा परिषद गटात सौ मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला.
माळशिरस तालुक्यात सर्व बौद्ध समाज सर्व आरपीआयचे नेते कार्यकर्ते एकवटले त्यामुळे आरपीआयचे नेते वरिष्ठ पदाधिकारी यांचे काही चालले नाही त्यामुळे मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा विजय म्हणजे भाजपला दिलेली मोठी चपराक मानली जाते.




















