कुर्डूवाडी – 23 एप्रिल रोजी कुर्डूवाडी पंचायत समिती कार्यालयाच्या दोन वेगवेगळ्या सभाग्रहात एकाच दीवशी राष्टृवादी श.प. चे आ.अभिजीत पाटील व भाजपाचे पं.स.चे सभापती पंडीत देशमुख यांनी बैठका घेतल्या. आमदारांनी कृषि विभागाची पावसाळ्यापुर्व खरीप हंगाम आढावा तर सभापतींची पं.स.ची मासीक सर्वसाधारण सभा घेतली. मात्र आमदारांच्या आढावा बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून राहीलेल्या सभापतींनी बैठक न सोडल्याने आढावा बैठकीस लवकर अधिकारी उपस्थीत राहू शकले नाहीत. सुमार दिड तास आमदारांना वेटींगवर रहावे लागले.याचवेळी पदाधिका-यांच्या आसनवेवस्थेत तालुका कृषि अधिका-यांनी प्रोटोकाँल तोडून जि.प. व पं.स. सदस्यांची व्यवस्था केल्याने सर्वत्र नाराजीचा सुर दीसत होता.दोन जि.प.सदस्यांनी तर बैठक सोडून जाणेच पसंद केले.
@ कुर्डूवाडी पंचायत समितीच्या कै.विठ्ठलराव शिंदे सभाग्रहात उपविभागीय कृषि अधिकारी संजय वाकडे व तालुका कृषि अधिकारी हनुमंत बोराडे यांनी आ.अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थीतीत तालुका पावसाळ्यापुर्व खरीप हंगाम आढावा बैठक आयोजीत केली होती.या बठकीस पंचायत समितीचे सभापती पंडीत देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. मात्र सभापतींनी कधीही सोमवार व गुरवार पंचायत समितीची बैठक घेतली नाही यावेळी मात्र गुरवारी पं.स.ची सर्वसाधारण सभा घेतली. एकाच वेळी माढा तालुक्याच्या दोन मोठ्या नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या सभाग्रहात बैठका झाल्या.सभापतींच्या या पवित्र्याने आमदारांची दुपारी दोन वाजताची आढावा बैठक तीन वाजता सुरू करावी लागली.सभापतींनी बीडीओ सह एकही अधिकारी लवकर सोडला नाही.आमदारांच्या आढावा बैठकीला तोपर्यंत एकही पं.स.सदस्य व एकही अधिकारी उपस्थीत नव्हता.साडेतीन वाजता सभापतींची बैठक सुटली अन सभापती, उपसभापती स्वाती गीड्डे यांच्यासह सर्व पं.स.सदस्य व अधिकारी आढावा बैठकीस आले त्यावेळेस बैठक परिपुर्ण झाली.
@ तालुका कृषी विभागाच्याच्या आमदारांच्या या आढावा बैठकीमध्ये प्रोटोकाँल नुसार बैठक व्यवस्था केलीच नव्हती.या बैठकीस पं.स.च्या महीला सदस्याबरोबर त्यांचे पतीही मागेमागे आले.आसनव्यवस्थेत गोंधळ उडाला.जि.प.आण्णा ढाणे,राष्टृवादी काँग्रेस अ.प.पक्षाचे गटनेते आशिष रजपूत एका कोप-यात तर उपसभापती स्वाती गीड्डे दुस-या कोप-यात बसले होती.प्रोटोकाँलनूसार कृषिविभागाची बैठक व्यवस्था नसल्याने जि.प.सदस्य आ्ण्णा ढाणे कारण सांगून सुरवातीसच निघून गेले.बाकीचे सर्व सदस्य व त्यांचे पतीराज तसेच बसून राहीले.यावर सर्वाची नाराजी दीसुन आली.
पावसाळ्यापुर्वी खतांचे नियोजन करा,सरकारच्या योजनेची माहीती तळागाळापर्यंत पोहचवा,शेतकरी अडचणीत येईल असे काम करू नका असे अधिका-यांना संबोधून युरीयाची लिंकींग होत आहे हे जाहीर कबूली देताना खुद्द कृषिमंत्र्यांनी सभाग्रहात लिकींगबाबत कबुली देवून यावर सरकार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे माढ्याचे आ.अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगीतले.जलतारा योजना राबवीण्यासाठी माझे काही सामाजीक संस्थांशी,कान्ट्ँक्टर यांच्याशी बोलणे झाले आहे त्यांची मदत घेवून, कंपन्यांचा सी.एस.आर.घेवून पुढील काळात मोठ्या ताकतीने जलतारा योजना तालुक्यात राबवणार असल्याचे माढ्याचे आ.अभिजीत पाटील यांनी सांगीतले.
तालुक्याचे नेत्यांचे ज्या पध्दतीने लक्ष असायला पाहीजे तेवढे लक्ष तालुक्यावर नसल्याचे दीसते कारण तालुक्यात सध्या शेती करारावर देण्याचे सत्र सुरू आहे त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.शेतकरी अडचणीत येत आहे.याची संपुर्ण चौकशी होणे गरजेचे आहे.ही दुर्दशा संपवायची असेल तर सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे तरच स्वताचे भविष्य उज्वल आहे.असे प्रतीपादन पं.स.सभापती पंडीत देशमुख यांनी सांगीतले.
राष्टवादी पक्षाची बैठक की शासकीय आढावा बैठक— तुकाराम ढवळे.
तालुका कृषि विभागाने आयोजीत केलेली मिटींग ही राष्टृवादी शरद पवार पक्षाची होती की खरीप आढावासाठी होती. कारण या बैठकीस शरद पवार पक्षाची एकही लोकशाहीतले पद नसलेले जि.प.चे पराभूत उमेद्वार राहीलेले भारत शिंदे, बाळासाहेब पाटील हे पुढच्या रांगेत अन भाजपाच्या पं.स.उपसभापती स्वाती गीड्डे लांब एका कोप-यात तर बाकी पं.स.सदस्य दुस-या रांगेत बसले होते.हा कोणता प्रोटोकाँल आहे. प्रोटोकाँल तोडून आमदारांनी बैठक घेतली. याबाबत प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तालुका कृषि अधिकारी हनुमंत बोराडे ,तहसिलदार संजय भोसले यांनी सांगावे अशी प्रतीक्रीया माढा पं.स.चे माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांनी म्हटले आहे.
पंचवीस लाखाची बोगस बीले.
तालुक्यात अनेक ठीकाणी गाळमुक्त तलाव योजना राबवीली गेली. मात्र या कामात अनेक ठीकाणी गाळ काढला गेला नाही तर काही ठीकाणी खोटी कामे दाखवून खोटी पंचवीस लाखापर्यंतची बीले काढली गेल्याने तालुक्यात तालुका कृषी अधिकारी परफेक्ट नाहीत त्यांच्या कामावर सर्वत्र नाराजी आहे.पुढील काळात भूजल पातळी वाढवायची असेल तर जलतारा योजनेचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.
वाय.जी भोसले.
सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी
बेंबळे


























