आदरणीय, अरुणोजीराव श्रीनिवासराव देशमुख वय 90 वर्ष यांचे दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता अचानक निधन झाले. सुरुवातीस ते काँग्रेसचे व नंतर एस. काँग्रेसमध्ये गेले. 1972 ला परंडा भूम मतदार संघासाठी लढले. बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे फाउंडर व्हाईस चेअरमन तसेच भुम दुध संघाचे फाउंडर मेंबर डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांचे तसेच शरद पवार साहेबांचे विश्वासू व सहकारी मित्र एस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकाचे संचालक वाशी येथील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयासाठी 51 एकर जागा मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा. कर्मवीर मामासाहेब महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, वाशी शहरातील विद्युतीकरण सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, भरीव कार्य जुनी पाणीपुरवठा योजना, बस स्थानक व बस स्थानकामध्ये जाण्यासाठी स्वतःची मोफत जमीन त्यांनी रोड साठी दिल्या.
सत्यतावादी व शांतता प्रिय नेतृत्व सोसायटी इमारतीचे बांधकामासाठी पुढाकार काही वर्षे सोसायटीचे चेअरमन व सदस्य अशा या सत्यवादी नेत्याचे दुःखद अकालीन निधन झाल्याने यांची अंत्ययात्रा आज दिनांक 19 मे रोजी त्यांच्या शेतात काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिराजदार आंबेडकर कारखान्याची चेअरमन अरविंद गोरे साहेब, जीवनराव गोरे साहेब, भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे, रंजीत दादा मोठे, डीसी चे बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, मानूआप्पा मोटे, वाशीचे उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे, माजी नगराध्यक्ष नितीन जी चेडे, शेकापचे भाई भगवानराव उंद्रे, भाई कवडे, माजी सभापती सदाशिव पवार, नगरपंचायत चे सदस्य विकास पवार, शिवसेना तालुका अध्यक्ष विकास मोळवणे, सूर्यकांत सांडसे, सर्व देशमुख बंधू कोल्हापूर व पुण्याचे सर्व पाहुणे गावातील राजकीय नेते पत्रकार शिक्षक व सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदल्या दिवशी पंडितराव चेडे व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. यादव, प्रा.मोरे, प्रा. कटारे, नंदकुमार जगदाळे, पाटील वगैरेंनी येऊन अंतिम दर्शन घेतले. शेवटी अरुणोजीराव देशमुख यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी अग्नी दिला यानंतर मच्छिंद्र तात्या कवडे, सदाशिवराव जगताप, प्राध्यापक समाधान माने, हरून काझी, प्राध्यापक जाधव सर, माननीय जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल भैया मोटे तसेच शेकापचे कवडे यांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वजण शोक सागरात बुडून गेले होते. माझी पोलीस निरीक्षक गोविंदराव पवार साहेब यांना बोलताना कंठ दाटून आला. सर्वांनी जड पावल्याने त्यांना अखेरचा निरोप दिला.