अकलूज : अकलूज शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल ५३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अकलूज नगरपरिषदेचे
उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि विशेष पाठपुराव्यामुळेच हा भव्य निधी मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. हा निधी केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष कामांना वेगात सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५३९ कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च होणार? जाणून घ्या सविस्तर:
२४ तास शुद्ध पाणीपुरवठा योजना (निधी: २१२ कोटी रुपये)
शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी सर्वाधिक म्हणजेच २१२ कोटी रुपये खर्च केले जात आहेत:
१२ महिने मुबलक पाणी:७७ मैल ते विझोरी तळे दरम्यान ९ किलोमीटरची नवीन स्वतंत्र पाईप लाईन टाकली आहे. त्यामुळे नागरिकांना आता वर्षभर पाणी मिळेल. येथे सौर ऊर्जा (सोलर सिस्टीम) आणि जॅकवेलची सोयही केली आहे.
230 एम एल डी चा जुना पाण्याचा बॅलन्स टॅंक बदलून आता ६८० MLD क्षमतेची नवीन मजबूत RCC बॅलन्स टॅंक होणार आहे
नवीन टाक्या: शहरात ५ नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. यातील शिवकीर्तीनगर व पंचवटी येथील काम पूर्ण झाले असून विद्यानगर आणि राऊतनगरचे काम सुरू आहे. गुळवेनगरचे काम लवकरच सुरू होईल.
विझोरी तळे येथे मोठी टाकी सर्व भागात सारख्या दाबाने पाणी जाण्यासाठी विझोरी येथे ८.५० लाख लीटरची ‘मास्टर बॅलन्सिंग’ टाकी तयार आहे.
माळेवाडीकरांचा ४० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटणार!
माळेवाडीतील शिवाजीनगर, पटेल कॉलनी आणि शांतीनगर भागातील ८०० कुटुंबांना १९८५ पासून (ग्रामपंचायत काळापासून) फक्त बोरवेलचे पाणी मिळत होते. आता या योजनेमुळे त्यांना नळाचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
. भुयारी गटार (अंडरग्राउंड गटर) योजना (निधी: १२१ कोटी रुपये)
शहरातील स्वच्छता आणि आरोग्यासाठी १२१ कोटी रुपये खर्च होत आहेत:
१३० कि.मी. पैकी ७० कि.मी. गटाराचे काम पूर्ण झाले आहे.
५,००० मुख्य चेंबर पैकी ३,३०० आणि ७,००० साईड चेंबर पैकी ३,६०० चेंबर्सचे काम पूर्ण झाले आहे.
अकलाईदेवी मंदिराजवळ मलजल शुद्धीकरण केंद्र (STP) उभारले जाणार आहे.
भव्य रस्ते विकास (निधी: १२० कोटी रुपये)
शहरातील रस्ते चकचकीत करण्यासाठी १२० कोटींची तरतूद आहे. यात १८ कि.मी. रस्ते आणि ३६ कि.मी. गटारींचे नियोजन असून, सध्या ५ कि.मी. रस्ते व १० कि.मी. गटारींचे काम प्रगतीपथावर आहे.
बायपास रस्त्याचे सुशोभीकरण व इतर कामे (निधी: ८४.२० कोटी रुपये)
CRF बायपास रस्ता (१७ कोटी): जयसिंह चौक ते महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक दरम्यानच्या बायपास रस्त्याचे पूर्ण रूप बदलणार आहे. इथे रस्त्याचे रुंदीकरण, दोन्ही बाजूला फूटपाथ, बसण्याची सोय, सुंदर डिव्हायडर, झाडे आणि आकर्षक लाईट्स लावले जातील.
जिल्हा नियोजन निधी (६४ कोटी):तालुक्याच्या व शहराच्या इतर विकासकामांसाठी.
चौक सुशोभीकरण व डेकोरेटिव्ह पोल (३.२० कोटी): मुख्य चौकांचे सुशोभीकरण करून महर्षी चौकात आकर्षक डेकोरेटिव्ह पोल बसवले जातील.
पालखी अनुदान (८० लाख): पालखी मार्गावर मुरूम टाकणे, खड्डे बुजवणे, लाईट्स व आरोग्याची सोय करण्यासाठी.
विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात ‘नमो उद्यान’ (निधी: १ कोटी रुपये)
नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी क्रीडा संकुलात १ कोटी रुपये खर्चून सुंदर ‘नमो उद्यान’ (बगीचा) बनवले जात आहे. यामध्ये सुंदर वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम, योगा हॉल, सुंदर लॉन आणि आकर्षक रोषणाई केली जाणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, अकलूज शहराला एक आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मोहिते पाटील परिवाराच्या माध्यमातून हा ऐतिहासिक विकास रथ गतिमान झाला आहे.
Post Views: 21