पंढरपूर -आजच्या युगात नवीन विकसित एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे माध्यमातून विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षक, प्राध्यापक यांचेवर येवून ठेपली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून येणारी नवीन पिढी घडवणे हे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम बरोबरच या स्पर्धेच्या युगात महत्वाचे बनले असले तरी आपली संस्कृती,संस्कार हे देखील विसरता कामा नये असे प्रतिपादन मुंबई येथील अन्टीकरप्शन विभागाचे डीआयजी संदीप दिवाण यांनी केले.
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वधिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रेडिओ स्टार दिलीप टोमके उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिवाण म्हणाले, विद्यार्थी कुठे ही शिक्षण घेत असला तरी त्याचे जे १५ ते १८ हे शिकायचे वय असते या वयात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे तुम्ही शिक्षक करत असता.सध्याची पिढी हि खुपच स्मार्ट आहे
साधारणपणे १९८७/८८ काळात स्व.राजीव गांधी यांनी एक विचारातून खंत व्यक्त केली होती ती म्हणजे येणाऱ्या नजिकच्या काळात टेक्नॉलॉजी, डिजिटल ची क्रांती होईल तेव्हा आपण खूप पुढे असू पण आपल्या देशाचा जो संस्कार,संस्कृतीचा पाया आहे तो कुठे राहिल यात मला शंका वाटते.जर आज आपण पाहिले तर सुमारे चाळीस वर्षापुर्वीचे शब्द किती खरे होत चालले आहेत हे आज दिसून येते.
आपल्याला सगळ्या गोष्टी जितक्या महत्वाच्या वाटतात तितकाच आनंद पण महत्वाचा,आपली संस्कृती महत्वाची आणि हे विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचे काम कोणी करत असेल तर तो तुम्ही शिक्षक वर्गच आणि शिक्षकांचे हेच कार्य त्यांच्या शाळेचे वेगळेपणा ठरु शकते हे देखील प्रत्येक शिक्षकाने लक्षात घेतले पाहिजे.
या बरोबरच विद्यार्थी शाळेत येतात अभ्यास करतात की नाही हि जबाबदारी जेवढी शिक्षकांची असते तेवढीच ती पालकांचीही असते. पुर्वी छडीचा एकप्रकारे धाक होता तो आज राहिलेला नाही. पालकांच्या अपेक्षा देखील आज वाढलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत शिक्षकांना ज्ञान दानाचे कार्य करावयाचे आहे.
जो चांगला शिक्षक असतो तो सर्वोत्तम विद्यार्थी घडवू शकतो. त्यामुळेच प्रत्येक शिक्षकांने मनापासून ज्ञानदानाचे काम करीत विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच त्यांच्या शारीरिक, मानसिक
अध्यात्मिक, सांस्कृतिक, बौध्दीक विकास होईल यादृष्टीने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमास सौ.मधूरा दिवाण, संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर ,सचिव वैभव टोमके, दत्त विद्या मंदिर सुस्ते येथील प्राचार्य एस.एस. कटकधोंड, उपप्राचार्य इ जी शिंदे, सौ आटकळे मॅडम मुख्याध्यापिका विवेक प्राथमिक विद्यालय,रूपाली टोमके व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापक टी.एन मस्के यांनी करून दिली. सूत्रसंचालन सौ.एस.एम.शितोळे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. यु.आर मुंडे यांनी केले .
Post Views: 11