अक्कलकोट – के.एल.ई.बालसंस्कार केंद्र व कन्नड प्राथमिक शाळा येथे इयत्ता चौथी निरोप समारंभ संपन्न झाला. कुमारी आरोही ज्ञानेश्वर भोसले हीने खाऊसाठी दिसलेल्या बचती मधुन भिंतीवरील आठ घड्याळ सप्रेम भेट दिल्याने तिच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता चौथीचा निरोप समारंभ संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सोनशेखर स्वामी साहेब व मंगरूळे प्रशालेचे जेष्ठ प्राध्यापक रामनगौडा पाटील सर हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्षा अश्विनी सुभाषचंद्र वाले (मुख्याध्यापिका, बालसंस्कार केंद्र) सुजाता बाबुराव नरोणे (मुख्याध्यापिका,कन्नड प्राथमिक शाळा) यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मीनाक्षी पाटील (मुख्याध्यापिका,शिशुविभाग) या उपस्थित होत्या.
निरोप समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात तिसरीच्या विद्यार्थिनींनी नृत्यपर स्वागतगीतातून अतिथींचे स्वागत केले.याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्गशिक्षक खंडेराव व्हडले व वर्गशिक्षिका सुरेखा कालीबत्ते यांनी आपल्या भाषणातून मुलांच्या प्रगतीचा आलेख मांडला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध गोष्टींच्या रूपातून त्यांच्या भावी प्रगतीचा लेखाजोखा मांडत विद्यार्थ्यांना बोलते केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार पवनकुमार बेंद्रे व कु. अरोही भोसले अमृता तंबाके यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचा आभार कु. आराध्या उपिन हिने मानला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतला. कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती होती.
कुमारी आरोही ज्ञानेश्वर भोसले या विद्यार्थीनीने खाऊला दिलेले पैसे जमा करून शाळेतील आठ वर्ग खोल्यामध्ये भिंतीवरील घड्याळ भेट दिले तीच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे .


















