अक्कलकोट – हन्नुर तालुका अक्कलकोट येथे बळीराजाच्या आवडीचा व अंत्यत जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न झाला . राज्यभरातुन १२६ बैलजोडयानी सहभाग घेतला . हन्नुर केसरीचा मानकरी सुमारे आडीच लाखाचे पहिले बक्षिस श्री सिध्देश्र्वर ग्रुप तोळनुर किरण पाटलांच्या सर्जाने व परभणीच्या सुंदर ने पटकाविला . दुसरा . क्रमांक तात्यासाहेब कचरे कचरेवाडी , अमोल पष्टे बदलापुर ;,तिसरा क्रमांक कलप्पा पुजारी हन्नुर ‘ चौथा क्रमांक अक्षय काका सिध्द माळशिरस ;पाचवा क्रमांक बाळासाहेब शिंदे पंढरपुर , सहावा क्रमांक बाबू ड्रायव्हर चप्पळगाव यांनी पटकाविला . आ . सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेंट्टी सलग पाचव्या वर्षी अक्कलकोटवासीयानां उत्कंठावर्धक बैलगाडा शर्यत थरार अनुभवण्याची संधी देत आहेत तालुकावासीयांतुन मोठा आनंद व्यक्त होताना दिसत आहे . मान्यवरांच्या हस्ते विजेत्यानां पारितोषिक बहाल करण्यात आले .
कल्याणशेट्टी बंधूचे काम नंबर वन
आमदार सचिन कल्याणशेट्टी व बंधू उपसभापती सागर कल्याणशेट्टी गोवंश संवर्धनाचे मोठे कार्य करीत आहेत .बैलगाडा शर्यतीसाठी मोठी बक्षीसे भव्य मैदान ‘ उत्कृष्ठ नियोजन राज्यातुन बैलगाडा शर्यतीकरिता मिiळणारा प्रतिसाद व शेतकऱ्याप्रती त्यांची असलेली आत्मियता खरोखरच त्यांचे कार्या नंबर वन आहे ;असे गौरवोद्गार भाजपा कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांनी यावेळी काढले .
..• आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे,
सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, शहाजी
पवार, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, नगराध्यक्ष
मिलन कल्याणशेट्टी, अंजली बाजारमठ, नगरसेवक
बिज्जूभाऊ प्रधान, संयोजक सागर कल्याणशेट्टी
यांसह जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा शौकीन हन्नूरमध्ये दाखल झाले होते. संभाजीनगर, धाराशिव, सातारा, पुणे, मुंबई, दापोडा-भिवंडी, परभणी, माळशिरस,सांगोला, बुलढाणा, पंढरपूर, माढा, मोहोळ येथुन १२६ बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता . राज्यातुन सिमावर्ती कर्नाटक राज्यातुन .सकाळपासुन शर्यत पाहण्यासाठी मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग जमा झाला होता . उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांची शेतकऱ्या प्रति असलेले मोठे प्रेम आत्मियता यामुळे सलग पाच वर्ष उत्कृष्ठ नियोजनद्वारे ही स्पर्धा राबवित आहेत . शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी अधुनिक शेती कृषी प्रदर्शन भरवावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे .
























