सोलापूर – ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत योजना गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण दिवस म्हणून तोरणी (ता.अक्कलकोट ) व अरळी (ता. मंगळवेढा ) येथे आज विविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची काम प्रगती पथावर सुरू आहेत.गावातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे.त्यानुसार आज तोरणी (ता.अक्कलकोट) व अरळी (ता.मंगळवेढा) या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या या गावात सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आज १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये आज गावातील पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती गावसभेमध्ये ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात आली.गावात उत्सव साजरा करताना पाण्याचे महत्व ग्रामस्थांना कळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली, जल प्रतिज्ञा, गावातून विद्यार्थी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच शुद्ध पाण्यासाठी (एफ.टी.के.) किटचे प्रात्यक्षिक दाखवून शुद्ध पाण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
तोरणी ता.अक्कलकोट येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी सरपंच बसम्मा मनगोळी, उपसरपंच चंद्रशा जिरोले,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रा.पा.पु विभागाचे उपअभियंता विद्याधर राठोड , कनिष्ठ अभियंता प्रवीण चव्हाण,ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर जक़्क़ीकोरे, पी एमसी नाबार्डचे जमादार,गट समन्वयक सतिश शिंगे,सी.आर.सी.प्रियांका संगमनेरकर, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच अरळी ता. मंगळवेढा येथे प्रभातफेरी, गावसभा, जलप्रतिज्ञा व एफ.टी.के.च्या माध्यमातून पाणी शुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक, कलश पूजन आदी उपक्रम राबविण्यात आले.तसेच दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर या शिक्षक कलावंत यांनी नाटीकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना, देखभाल दुरुस्ती, शुद्ध पाणी, स्वच्छता आदी प्रबोधन केले.सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य रमेश भांजे,पंचायत समितीचे नूतन सदस्या जयश्री कवचाळे, सरपंच लक्ष्मीबाई रजपूत , उपसरपंच उबरावती तोरणे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रा.पा.पु.उपविभागाचे उपअभियंता प्रसाद काटकर, कनिष्ठ अभियंता दत्ता घुले,ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल लिगाडे, प्रज्वल गायकवाड, पाणी गुणवत्ता सल्लागार गुरुदेव चौगुले ,दया वाकडे, संजय बिदरकर सर, एस.एम.बिराजदार, के.पी.कुंभार सर,गट समन्वयक, पाणी गुणवत्ता तज्ञ मिरजे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.






















