बाभूळगाव येथील जय नवघरे या तरुणाने ग्रामीण भागातील असतांना सुध्दा अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बॉडी बिल्डिंग, लठ बाजी व तलवार बाजी आशा कलांना आत्मसात करून त्यात प्राविण्य मिळवून त्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या उत्तुंग यशासाठी त्याचे मनस्वी अभिनंदन!
समस्या चघळत बसण्यापेक्षा त्या सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, प्रत्येकाला मुबलकता मिळेलच असं नाही. अनेकांना स्वतः ची पायवाट देखील स्वतः निर्माण करावी लागते. जयचा प्रवास याचे उत्तम उदाहरण आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...