पंढरपूर - येथील नामांकित शिक्षण संस्था 'कर्मयोगी विद्यानिकेतन' मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला....
Read moreसांगोला - विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा...
Read moreपंढरपूर - पंढरपूरात महावितरणच्या लोड शेडिंगच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा धडक...
Read moreकरमाळा - तालुक्यातील आळजापूर शिवारात वनविभागाच्या राखीव जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेले बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने काल एका धडक मोहिमेद्वारे...
Read moreसांगोला - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका उन्हाळी परीक्षेत सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश...
Read moreसोलापूर / तुळजापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित 'महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम २०२६' या कायद्याला सध्या स्थगिती देण्यात आली असली, तरी हिंदूंच्या प्राचीन देवस्थानांच्या, मठांच्या आणि मंदिरांच्या जमिनींच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र 'सनातन बोर्ड' स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित तुळजापूर व सोलापूर येथील बैठकींमध्ये करण्यात आली. या बैठकीस तुळजापूर येथे भोपी पुजारी मंडळ, पाळेकर पुजारी मंडळ, उपाध्याय पुजारी मंडळ तसेच सेवेकरी प्रतिनिधींसह ६० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी व धर्मप्रेमी सहभागी झाले होते. तर सोलापूर येथे सोलापूर शहर, बार्शी, मोहोळ आणि इतर तालुक्यांतील ४० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित व पुजारी उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, “जोपर्यंत पुजारी मंडळे संघटित होऊन एकत्रितपणे आपल्या मागण्या मांडत नाहीत, तोपर्यंत शासन आणि प्रशासन त्याची गंभीर दखल घेणार नाही. मंदिरांचे सुव्यवस्थापन, संघटन आणि समन्वय यांद्वारेच मंदिर संस्कृतीचे प्रभावी संरक्षण होऊ शकते.” बैठकीत मंदिर संस्कृतीचे संरक्षण, मंदिर व्यवस्थापनातील सुधारणा, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, मंदिर विकास आराखडा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तुळजापूर बैठकीत तुळजाभवानी मंदिर परिसरातील ब्रह्मदेव मूर्ती भंग प्रकरण, चौपदार दरवाजा काढताना झालेली मूर्तीची विटंबना, तसेच पुरातत्त्व विभागाच्या कथित मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली. बैठकीत देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी 'अँटी लँड ग्रॅबिंग' (भूमी बळकाव विरोधी) कायदा लागू करावा, तसेच ज्या प्रकारे अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी वक्फ बोर्ड अस्तित्वात आहे, त्याच धर्तीवर हिंदूंच्या प्राचीन देवस्थानांच्या आणि मंदिरांच्या जमिनींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र 'सनातन बोर्ड' स्थापन करावे, अशी मागणी एकमताने करण्यात आली. बैठकीत पुढील महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले : १. तुळजाभवानी मंदिर परिसरातील ब्रह्मदेव मूर्ती प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. २. देवस्थान मंदिर विकास आराखड्यात पुजारी, सेवेकरी आणि स्थानिक घटकांच्या मागण्यांचा समावेश करण्यात यावा. ३. पुरातत्त्व विभागाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ४. मंदिरांची स्वायत्तता, परंपरा आणि धार्मिक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे. ५. हिंदू मंदिरांच्या संरक्षण, व्यवस्थापन आणि विकासासाठी स्वतंत्र 'सनातन बोर्ड' स्थापन करण्यात यावा. ६. महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम २०२६ संदर्भात मंदिर संस्था, पुजारी आणि भाविकांनी सतर्क राहून एकत्रित भूमिका घ्यावी. ७. राज्यभरातील मंदिर, मठ, देवस्थान आणि धार्मिक संस्थांचे संघटन मजबूत करण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात यावे. या बैठकीस महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, किशोर गंगणे, बिपिन शिंदे, अमरराजे परमेश्वर (कदम), अनंत कोंडो, धनंजय लोंढे, महेश चोपदार, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी (कदम), नागेश शास्त्री नंदीबुवा अंबुलगे, परीक्षित साळुंखे राष्ट्र-भक्त अधिवक्ता परिषदेचे अधिवक्ता सतीश गाजुल, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे तथा मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक प्रसाद पंडित, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त सत्यनारायण गुर्रम, मल्लिकार्जुन मंदिर शेळगीचे जगदीश पाटील, श्री मल्लिकार्जुन मंदिरचे मनोज हिरेहब्बू, श्री नागनाथ देवस्थान वडवळचे श्रीकांत शिवपुजे, पुरोहित संघटनेचे गोविंद गवई, नागनाथ देवस्थान शांती नगरचे रवींद्र कोळी, श्रीवैष्णव मारुती देवस्थानचे नारायण दुभाषी, श्री निवास पतंगे, सदगुरू प्रभाकर महाराज मंदिराचे बाळकृष्ण शिंगाडे, श्री अमोगसिध्द मंदिराचे संतोष पुजारी, जुने श्री विठ्ठल मंदिरचेश्री शैलेंद्र जोशी, हिंदू जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे, मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ, श्री. धनंजय बोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Read moreटेंभुर्णी : माढा तालुक्यातील रांझणी पंचायत समिती गणातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना देणारा निर्णय घेत विविध रस्ते विकास कामांसाठी...
Read moreपंढरपूर – गेल्या दोन तीन वर्षापासून रेंगाळत असलेल्या पंढरपूर काँरिडोरला अखेर राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून १८...
Read moreसोलापूर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये...
Read moreपंढरपूर - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बहुचर्चित 'श्री विठ्ठल...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697