बार्शी – ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व सावली फाउंडेशन बाभुळगाव, ता. बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंतीनिमित्त दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी संपूर्ण शालेय साहित्य तेल गिरणी चौक येथील सावळे सभागृह येथे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री शशिकांत गायकवाड (रसायनशास्त्र प्रा. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सावली फाउंडेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर बरगे यांचे वडील नंदकुमार बरगे व बाभुळगावचे सरपंच श्रीरंगभाऊ शिंदे, माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष अमृतनाना राऊत, रिपाइं बार्शी शहराध्यक्ष ऍड.अविनाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते अजित कांबळे, अशोक सावळे व संस्थेच्या महिला सदस्या रागिनी झेंडे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.
शब्द सुमनाने अध्यक्ष व पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले. दीप प्रज्वलन करुन विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ऍड. अविनाश गायकवाड, अजित कांबळे,अशोक सावळे व सावली फाउंडेशनच्यावतीने धनंजय उकिरडे यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्याला संबोधित करताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी छोटी स्वप्न न पाहता आपल्या भारताचे मिसाईल मॅन ए पी जी अब्दुल कलाम यांच्यासारखी स्वप्ने पहावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीत अभ्यासाला गेल्यानंतर प्रथम येणारा विद्यार्थी आणि शेवट जाणारा विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.
अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त आपण कमीत कमी एक तास तरी रोज अभ्यास करावा व या कालावधीत पालकांनी आपले मोबाईल बंद ठेवावेत असा मौलिक सल्ला दिला.
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीचे कार्य हे समाज उपयोगी आहे त्याचा लाभ घेऊन महापुरुषांच्या विचार आपल्या जीवनात अंगीकृत करून आपले जीवन महान बनण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी २३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे राहुल वाणी, अजय तिवारी, संतोष शेळगावकर, माणकोजी ताकभाते,चंद्रकांत उलभगत, सुनील फल्ले, नागनाथ सोनवणे, सुरेंद्र स्वामी, सुनील नवले, सागर घंटे, भरत जाधव, गणेश कदम, चंद्रमणी बोकेफोडे अस्तम चंदनशिवे, नगरसेविका सायरा मुल्ला, रागिनी झेंडे, रेखा विधाते,कोमल वाणी, माधुरी वाणी सुजाता अंधारे, अरुणा शेळगावकर, सुनिता गायकवाड,अलका हाडगे, आशादेवी स्वामी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन नागनाथ सोनवणे यांनी तर आभार सचिव अजय तिवारी यांनी मानले.



























