जेऊर – आंबील पौर्णिमा उत्सवाने चिखलठाण ता करमाळा येथिल कोटलींग यात्रेला सुरुवात झाली आहे भाविकांच्या उपस्थितीत कोटलींग जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न होऊन देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मुख्य यात्रा चैत्र कृष्ण अष्टमीला म्हणजे दहा एप्रिल रोजी संपन्न होत आहे.
सोलापूर सातारा धाराशिव पुणे नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटलींग देवाची यात्रा ही करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते चैत्र पोर्णिमेच्या दिवशी “चांगभले “च्या जयघोषात कोटलींग जोगेश्वरी विवाह सोहळ्याने या यात्रेची सुरुवात होते मुख्य यात्रा चैत्र कृष्ण अष्टमीला म्हणजे 10 एप्रिल रोजी छबीना मिरवणूक होणार आहे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणार्या या यात्रेत विविध जाती जमातीच्या समाजातील लोकांना मान असतो गावातील परिट समाजातील प्रतिधीच्या हस्ते देवाला तेल लागते, आंबील पौर्णिमा दिवसी या देवाच्या मानाच्या कावडी बसवल्या जातात. देवाला तेल लागल्याच्या कालावधीत गावातील लोकांकडून तेलवान कडकपणे पाळले जाते .यामध्ये मांसाहार पुर्णपणे बंद असतो देवाचे भक्त चैत्र शुक्ल सप्तमी म्हणजेच 25 मार्चपासून नऊ दिवसाचे उपवास धरतात पौर्णिमे दिवशी आंबील पिऊन हे उपास सोडले जातात आंबिल पोर्णिमेच्या आरतीनंतर ढोल लेझीमचा ठेका धरत देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. बारा बलुतेदार संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत सर्व जाती समाजातील लोक सहभागी झाले होते. तेल लागल्यापासुन यात्रा पुर्ण होईपर्यंत ससा- मासा,देव-पारध,देव शिकारीसाठी जाणे हे विधी असतात या कालावधीत शेतीची मशागतीची कामे करणे,दाढी करणे,केस कापणे,गादीवर झोपणे बंद असते चैत्र कृष्ण अष्टमीला छबीना मिरवणूक काढण्यात येते यामध्ये मुक्त हस्ताने गुलालाची उधळण करत हजारो भाविक सहभागी होतात.या दिवसी देवाच्या मानाच्या कावडी देवाला धार घालतात .
फोटो ओळी;-चिखलठाण ता करमाळा येथील कोटलींग देवाचा अंबील पौर्णिमा उत्सवातील पालखी मिरवणुकीत सहभागी भाविक.फोटो सौजन्य एस के फोटोग्राफी चिखलठाण

















