आटपाडी – सर्वसंपन्न, परिपूर्ण भारत घडावा म्हणून आटपाडी तालुक्यातील सर्व ज्येष्ठांनी, देशाला – राज्याला योग्य दिशा देण्यासाठी पुढे यावे, एकवटावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले .
अर्थक्रांती जीवन गौरव ज्येष्ट नागरीक संघटनेच्या वतीने पत्रकार, गुणवंतांचा आणि सत्कार व नवीन सभासदांचे स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी सादिक खाटीक बोलत होते .
पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल प्रा . अभयसिंह विठ्ठलराव उर्फ पोपटराव देशमुख, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक, संपादक लक्ष्मण खटके, पत्रकार प्रशांत देशमुखे, पत्रकार सुधिर पाटील, पत्रकार सुरेश मोकाशी यांचा यावेळी सत्कार करणेत आला .
प्रत्येक भारतीय हे देशाचे मालक, विश्वस्त, राजे आहेत, याचा विसर पडल्यानेच कोट्यावधी भारतीयांना आज अनंत अडचणी, संकटे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी, देशाच्या सर्व धर्मिय धार्मिक व्यवस्थांमध्ये भारतीय बजेट च्या १८ पट पैसा जमत असल्याचे सांगीतले जाते . कोट्यावधी देवभोळ्या सर्वसामान्यांच्या खिशातून धार्मिक स्थळी गोळा होणाऱ्या पैशापैकी बराचसा पैसा शासनाने ताब्यात घेतल्यास देशाचा सर्वांगीम व चौफेर विकास प्रतिवर्षी १८ पटीने साधला जाईल . त्यामुळे प्रत्येक देशवाशीय सुखी संपन्न आणि समृद्ध बनेल असे मत ही त्यांनी मांडले .
राजकीय व्यवस्थेने बहुसंख्य भारतीयाचे कसे दशावतार केले . आणि आपण मालक असल्याचा विसर प्रत्येकाला कसा पडला . याची उदाहरणे देऊन सादिक खाटीक यांनी, शासकीय व्यवस्थेतून ज्येष्टांच्या आटपाडी शहरातील ज्येष्ट नागरीक भवनासाठी १० गुंठा जागा उपलब्ध करून दिल्यास आपण आमदार खासदार महोदयांच्या माध्यमातून यासाठी २ कोटी रुपयाचा निधी आणण्यात यशस्वी होवू. असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील यांनी आटपाडीतील ज्येष्टांना दिलेली सन्मानजनक वागणूक व प्रलंबीत विधेयकासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या आश्वासना बाबत सादिक खाटीक यांनी आटपाडी तालुक्यातील ज्येष्ट नागरीकांच्या वतीने आमदार जयंतराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली .
प्रारंभी स्वागत, स्वरूप व प्रास्ताविक करताना ज्येष्टांचे नेते अरविंद चांडवले यांनी, ज्येष्टांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाने तातडीने निर्णय करावा . अशी अपेक्षा व्यक्त केली .
ज्येष्टांच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष व्ही . एन . देशमुख सर आणि जिल्हाध्यक्ष भास्करराव गायकवाड यांनी, आमदार खासदार यांना मानधन पेन्शन मिळते . त्याच न्यायाने ज्येष्टांना १०००० रुपये सन्मानधन मिळावे, ज्येष्ठांना सर्व क्षेत्रात सवलती दिल्या जाव्यात . ज्येष्टांचे विधीमंडळात प्रलंबीत असलेले विधेयक मंजुर व्हावे, ज्येष्टांच्या साठीच्या भवनाला आटपाडी शहारात जागा मिळावी . त्यासाठी पत्रकारानींही आवाज उठवावा . देशातील १५ कोटी ज्येष्ट नागरीकांसाठी आमच्या संघटनेची प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे . संघटना वाढीसाठी एकजुटीचे प्रयत्न व्हावेत . शिवाय ज्येष्टांना शासनाच्या सोयी सुविधा मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे प्रयास यावर मार्गदर्शन करण्यासाठी शासन स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीर आयोजित करण्याचा मानस या मान्यवर द्वयीनी बोलून दाखविला .
आटपाडी तालुका क्रांतीकारकांची, लढवय्यांची भुमी आहे . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील पाणी चळवळीसह अनेक आंदोलने चळवळींना या भुमीतुनच यश मिळाले आहे . बळ मिळाले आहे . सर्वसमावेशक सांघीक शक्तीच्या जोरावर आपण ज्येष्टांच्या अनेक प्रश्नावर मार्ग काढण्यात यशस्वी होवू असे मत आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते डी . एम . पाटील सर यांनी व्यक्त केले .
दै . प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी सर्व पत्रकारांच्या सत्काराबद्दल संघटनेचे आभार मानले .
यावेळी ज्येष्टांचे नेते नंदकुमार राक्षे, दत्तात्रय मोकाशी, अनिलराजे देशमुख, नामदेवराव पाटील, भास्कराव चोथे, नागनाथ गोडसे, काशीनाथ गायकवाड, सौ . गुलशन वंजारी, सौ . राबियॉबसरी खाटीक, विजया चांडवले, निर्मला चव्हाण, सुमन गोडसे, लक्ष्मी मोटे, रेणुका राक्षे, लक्ष्मी भिसे, हणमंतराव राक्षे, रामचंद्र भिसे, महादेवराव कोळी, शिवाजीराव देशमुख, मारुती देशमुख, आनंदराव गायकवाड, व्ही . पी . देशमुख, बाळासाहेब गायकवाड इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
प्रारंभी प्रार्थना सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात झाली . आणि पसायदानाने सांगता करणेत आली .


















