Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
December 6, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर –  येथील वैकुंठ स्मशानभूमीतील ५० लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेली गँस दाहिनी गेल्या दोन,चार वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांच्या पार्थिवावर या गँसदाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असताना देखील मृतांच्या नातेवाईक मंडळींना येथील स्मशानभूमीमध्ये सध्या पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत सुरु करावी अशी मागणी शहर व उपनगरातील नागरिकांमधुन केली जात आहे.


येथील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेहावर लाकडाचा वापर करुन अंत्यसंस्कार करण्यात येत होते. लाकडाच्या वाढलेल्या किंमती आणि लाकूड वापरामुळे प्रचंड प्रमाणात होत असलेले प्रदूषण तसेच दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन यामुळेच इंधनासाठी लाकडा ऐवजी सोलार किंवा गँसचा वापर करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे.


दरम्यान पंढरपूरातील वैकुंठ स्मशानभूमीत राज्यसभेचे तत्कालीन खासदार राजकुमार धुत यांच्या खासदार निधीतून पन्नास लाख रुपये आणि येथील नगरपालिकेने काही निधी खर्चुन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गँस दाहिनी उभी केली होती. 


गँस दाहिनी उभी करण्यात आल्यावर देखील येथील स्मशानभूमीत पारंपारिक पध्दतीने आणि गँस दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पालिकेकडून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. सुरुवातीला काही दिवस मृतांच्या अनेक इच्छुक नातेवाईकांकडून या गँस दाहिनीमध्ये आपल्या आप्तस्वकीयाच्या मृतदेहांवर अंत्यंस्कार करण्यात आले होते. तर ज्यांना गँसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणे पटत नव्हते ते पारंपारिक पध्दतीने आपल्या नातेवाईकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत होते.


मात्र गँस दाहिनी सुरु झाल्यावर काही महिन्यांमध्येच कोरोनाच्या एक, दोन लाटा आलेल्या होत्या. त्या काळात कोरोना आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या इतरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेवून अंत्यसंस्कार करण्याच्या प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा देखील लावण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी सुरुवातीला तर कुटुंबातील एक, दोघां सदस्यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांकडूनच कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.


येथील स्मशानभूमीत देखील खबरदारी घेऊन कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर सुरुवातीला काही दिवस गॅस दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी येथील नगरपरिषदेकडून एक हजार रुपये एवढा माफक दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींच्या काळात अंत्यविधीसाठीचा येणारा खर्च देखील कमी झाला. पर्यायाने होणारे प्रदूषणही देखील रोखले गेले.

या बरोबरच अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील कमी झाला होता ही एकीकडे वस्तुस्थिती होती. 
तर दुसरीकडे मात्र कोरोनामुळे झालेले मृतदेह जाळल्यामुळे याचा परिणाम विपरीत झाला. कारण कोरोनामुळे मृत झालेले मृतदेह हे प्लास्टिक बँग मध्ये ठेवलेले असायचे. त्यामुळे अशा पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना तो गँस दाहिनी मध्ये तसाच ठेवला जायचा. अशा प्रकारे कोरोनामुळे मृत झालेल्या अनेकांच्या पार्थिवावर त्यावेळी या गँसदाहिनी मध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे गँस दाहिनीच्या चिमणी मध्ये काजळी चढत गेली. परिणामी पर्यावरण पूरक असणारी ही गँस दाहिनी बंद पडली.


दरम्यान पालिकेकडून पुन्हा या गँस दाहिनीच्या दूरुस्तीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन,चार वर्षापासून शहर तसेच उपनगरातील नागरिकांना आपल्या नातेवाईकाच्या मृतदेहावर गँस दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असून देखील गँस दाहिनी बंद असल्यामुळे त्यांना पारंपारिक पध्दतीनेच लाकडे जाळून अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी खर्च देखील मोठा येतो आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे यासाठी वृक्षतोड देखील करावी लागत आहे. पावसाळ्या मध्ये लाकडे ओली असल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कमालीचा त्रास होत असतो. त्यामुळे पालिकेने या सर्व बाबींचा विचार करुन लवकरात लवकर गँस दाहिनीच्या दूरुस्तीचे काम हाती घ्यावे.

येत्या काळात ती दूरुस्त करावी आणि नागरिकांना गँस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शहर तसेच उपनगरातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
—————————


गँस दाहिनी दुरुस्त झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे सोपे होईल. या बरोबरच होणारे प्रदूषण टाळले जाईल,पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील थांबला जाईल. त्यामुळे पालिकेने त्वरीत बंद पडलेली गँस दाहिनी सुरु करावी अशी आमची विनंती आहे. 
अजय जाधव (शहरातील एक सुज्ञ नागरिक)
————————–


फोटोओळी : पंढरपूर : येथील वैकुंठ स्मशानभूमीतील गँस दाहिनी सध्या बंद असल्यामुळे मृतदेहांवर पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

Post Views: 27
Previous Post

अतिवृष्टीचा प्रस्ताव गेला नाही हा राज्य सरकारचा बेजबाबदारपणा – माजी खा. राजू शेट्टी

Next Post

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कामगारांवर उपासमार, शासनाने लक्ष देण्याची गरज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कामगारांवर उपासमार, शासनाने लक्ष देण्याची गरज

ताज्या बातम्या

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

विदेशी दारूची बनावट लेबले तयार करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद

February 15, 2026

जिल्हा परिषदेची निवडणूक ही संपूर्ण समाज व आरपीआयचे एकवटलेल्या नेत्यांनी खेचून आणलेला विजय

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680724

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697