पिलीव – महाराष्ट्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निरा खोऱ्यातील धरणात यंदा मुबलक पाणी साठा आहे .निरा खोऱ्यातील धरणे यंदा जवळपास 97 टक्के भरली आहेत.
भाटघर,निरा,देवधर, विर व गुंजवणी या धरणाची पाणीसाठा क्षमता 49 टक्के आहे.सध्या या सर्व धरणात 47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.यंदा भाटघर,निरा_ देवधर व विर ही धरणे 100 टक्के भरली आहेत यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे.यंदा त्यामानाने सोलापूर, सातारा,पुणे सर्व जिल्ह्यया त पाऊस चांगला झाला आहे.त्यातच सोलापूर जिल्ह्यात यंदा अगदी आकटोंबर _ नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाण्याची कसलीच गरज भासली नव्हती .
यामुळेच कॅनॉलला पाणी सोडण्यात आले नव्हते. अगदी दोन तिन महिन्यानंतर पाणी सोडण्यात आल्यामुळे याचा फायदा पुढे एप्रिल, मे ,जुन पर्यंत हे पाणी टिकुन राहणार आहे .याचा फायदा शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामातील पिकांना तसेच उन्हाळा हंगामातील पिकांना चांगला होणार आहे.सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तिन तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो. सध्या या भागात ऊस ,केळी ,मका ,गहु ,कडवळ व इतर फळबागा या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या डिसेंबर महिन्यात आवर्तन सुरू झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अडचण भासणार नाही .
आता डिसेंबर महिन्यात पिकांना पाणी कमी पडु लागले होते पण आता आवर्तन सुरू झाल्यामुळे यंदा पिक पाणी चांगले आहे .माळशिरस तालुक्यात सध्या ऊस लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे .उन्हाळ्यात यंदा पाणी कमी पडणार नाही याची खात्री पटल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सध्या ऊसाची लागवड करीत आहेत.तसेच यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा यंदा मिटणार आहे .
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.योग्य नियोजन केल्यास रब्बी हंगाम तसेच उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची कमतरता अजिबात भासणार नाही.सध्या कॅनाॅलला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.


















