मंगळवेढा – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ हंगामाकरिता दि. १ ते १५ जानेवारी २०२६ या पंधरवाड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन रु. २८५०/- प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्या त्या बँका व पतसंस्थांमध्ये वर्ग केला आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बोलताना त्यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम १८ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला आहे. पुढील गळीत हंगामासाठी ऑफ सीझनमधील सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा निर्धार आहे.शेतकऱ्यांच्या बिलाची वर्गीकरण व्यवस्थाकारखान्याने शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे विविध बँका व पतसंस्थांमध्ये ऊस बिले वर्ग केली आहेत.
प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धनश्री पतसंस्था मंगळवेढा अंतर्गत बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामडर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, शेलेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे., लक्ष्मी दहिवडी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी, गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, सिद्धनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु., लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु. या गावांतील शेतकऱ्यांची बिले वर्ग झाली आहेत.
गेटकेनमधील पंढरपूर, जत, मोहोळ, द. सोलापूर, उ. सोलापूर तसेच संपूर्ण कर्नाटक गेटकेनमधील शेतकऱ्यांची बिलेही वर्ग केली आहेत. जिजामाता पतसंस्था मंगळवेढा – मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला; रतनचंद शहा बँक मंगळवेढा-सांगोला गेटकेन; धनलक्ष्मी पतसंस्था अरळी – अरळी, नंदुर, दसुर, उंब्रज; लक्ष्मी पतसंस्था अरळी – बँकेच्या मागणी पत्रानुसार; भैरवनाथ पतसंस्था कंदलगाव – कंदलगाव, अकोला, मंद्रूप; ज्ञानेश्वरी को.क्रे.सोसायटी मंगळवेढा बँकेच्या मागणी पत्रानुसार; शंभु महादेवा मल्टीस्टेट को.ऑप क्र.सोसा.लि. लोणार – लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु. ही बिले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक चेकद्वारेही देण्यात आली आहेत.
चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की, सर्वांचे सहकार्याने सन २०२५-२६ चा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला. शेतकरी बिले, कामगार पगार, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे संचालक मंडळाचे कटाक्ष आहेत. कारखान्यावर कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसतानाही शेतकऱ्यांच्या विश्वासावर पूर्ण क्षमतेने हंगाम चालविला गेला. कमी ऊस क्षेत्र असूनही निर्धारित उद्दिष्ट साध्य झाले या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सदैव वेळेवर बिले वर्ग करण्याचा परिपाठ कायम ठेवला आहे. या हंगामातही त्यांनी हा मान राखला. पुढील हंगामासाठी ऑफ सीझनमध्ये सर्व तयारी वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा संकल्प संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.























