सोलापूर – आपली राज्य मराठी भाषा समृद्ध आहे त्यात पूर्वी पासून आजतगायत अनेक मुस्लिम साहित्यिकानी मराठी साहित्यात मोलाची भर घालती आहे हीं बाब समाधाची असली तरी साहित्यातील कथा – कादंबरी कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतो कवितेच्या विविध प्रकारचा लिखाण भरपूर होत आहे तसाच भरपूर लिखाण या प्रकारात ठळकपणे यायला हवे . अशी अपेक्षा प्रा . दस्तगीर जमादार यांनी अ भा मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित ” पुस्तकावा वर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत आपले मत व्यक्त केले . अध्यक्षपदा वरून ते पुढे म्हणाले – डॉ . शकील शेख , डॉ . इ जा तांबोळी यांनी आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून व कवी मुबारक शेख हे कवितेच्या माध्यमातून जी साहित्य सेवा केली आहे ते गौरवशाली आहे
त्यांच्या या पुस्तकांमुळे मुस्लीम मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे .
सोशल महाविद्यालयात झालेल्या
पुस्तकां वर बोलू ” ह्या कार्यक्रमाची सुरुवात कुरण पठणने झाली प्रास्ताविकेत सचिव अय्यूब अहमद नत्लामंदूनी कार्यक्रमाचे हेतू विषद करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले .
उपाध्यक्ष प्राचार्य डॉ तांबोळी , प्राचार्य शकील शेख , खजीनदार हसीब नदाफ , मुबारक शेख , इक्बाल बागबान , मजहर अत्लोळी यांनी पाहुण्यांचा शाल , बुके , स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केले या नंतर अनिसा शेख दौंड लिखित ” काव्य सप्तक ” हा काव्य संग्रह सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
या नंतर थेट चर्चेला सुरुवात झाली . आणि श्यामचा बाप या कादंबरीवर भाष्य करताना कवी खाजा भाई बशीर बागबान म्हणाले – व्यसनाधीनते मुळे उदध्दवस्त होणारे आईचे अथक परिश्रम , शिक्षण साठी संघर्ष करणारा तरुण जाती धर्माचा भेदभावा मुळे होणारी उपेक्षा आणि मातृत्वच्या त्यागतून उभे राहणारे जीवन हे सर्व घटक वाचकाला विचार प्रवृत् करतात . ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित घटकाना आवज देत ती वाचकाला अनेक प्रश्न विस्चारते परंतू समाजा कडून अपेक्षित असलेले उत्तर सा पडत नाही याची खंत वाटते .
त्यानंतर डॉ . शकील शेख यांची “ज़ुबा ” वर डॉ सुरैय्या परवीन जहागीरदार आपले विचार मांडताना म्हणाले – ‘जुबा ‘ उपेक्षिताच्या आवाजचे प्रतिनित्व करणरी व इतिहातील कटू सत्य उघड करणारी समाजिक दस्तएवज आहे व . भविष्यातील संघर्षीच्या काळात धर्म , सता , आणि द्वेषाच्या पलीकडे जाऊन शेवटी “मानवता”हाच सर्वोच्च मूल्य आहे असा संदेश देणरी
आहे .
शेवटी कवी मुबारक शेख रचित काव्य संग्रह ” अजान आणि चालिसा ” या वर प्रा बी एच . करजगीकर म्हणाले – अज़ान अणि चालिसा ही सोप्य सरळ भाषेतील काव्य संग्रह असले तरी त्यात मांडलेले विषय मात्र गंभीर दिसतात .समाजातील गरीबी , दारिद्री , शिक्षणाचा अभाव, तसेच झोपड़ीत राहून सुद्धा महलच्या स्वपना पर्यंत मजल मारणारी माणसाची सत्यतता दर्शविते, पुन्हा चर्चेत असलेल्या चेहरे साहिर लुधियानवी , उस्ताद बिस्मिल्लाह खान , बेगम हजरत महल , फातिमाबी शेख , मीना कुमारी , चित्रकार मकबूल फिदा हुसेन सारख्या व्यक्तिना सुद्धा आपल्या कवितेत सामील करून नवीन पिढील.” रु – ब – रु ” करण्याचा मुबारक शेख यांचा प्रा माणिक प्रयत्न फार सुंदर दिसतो . प्रा महंमद शेख यांनी सुत्र संचलन केले तर आभर हसीब नदाफ यांनी मानले .
दुपारच्या सत्रात दोंडच्या अतिसा शेख यांच्या अध्यक्षतेखाली कवी समेलनाची सुरुवात झाली यात राज्यभरातून आलेल्या कवी व कवियित्री नीं आपल्या राजकीय , सामाजिक , शैक्षणिक विषयावरील कविता ‘ गझल सादर करून सर्वांची दाद मिळविली , सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन कवी ॲड .हाषम पटेल ,हमीद शेख , कमलाकर सावंत औसा ‘ सिकंदर मुजावर मोहाळ , पठाण गुरुजी , फारूक काझी नूर जहां कोरबू , डॉ नसरीन बागबान मुळेगांव ,डॉ सुरैय्या परवीन , प्रा अनिसा शेख , प्रा . अय्यूब अहमद , मुबारक शेख , खाजा भाई बागबान पुणे, सफुरा तांबोळी , जाकीर त्रांबोळी , गौस शेख , , अ करीम सय्यद , इस्माईल शेख , प्रा बी एच करजगीकर , सुमय्या चौधरी , हाफीजा बागबान , जावीद शेख , अमीर पटेल , तहसीन सय्यद , यु एफ जानराव ‘ बशीर तांबोळी शाहीन सुलताना , जमालोदीन शेख ,नूरजहां यांचा सन्मानित करण्यात आले . सुरेख सुत्र संचलन तहसीन सय्यद ( लातूर ) यांनी केले तर आभार जाफर बांगी यांनी मानले .
या वेळी ॲड हाषम पटेल लातूर, फखरोदीन शेख अकलूज ,’ ‘इलीयास सिद्दीकी , प्रा आफताब मुल्लां , इक्बाल बागबान, नाना गव्हाण ‘ अबुबकर नल्लामंदू , हमीद शेख , हुसेन नदाफ , करीम सय्यद , शब्बीर जमादार , फय्याज शेख , आफताब मुल्लां ,उपस्थित होते .
Post Views: 13