यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि नात्यातील जिव्हाळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राखी बनविणे स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या व आकर्षक साहित्याचा वापर करुन सुंदर आणि कल्पक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
रक्षाबंधनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, सहकार्याची भावना तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयीची आवड निर्माण झाली.
मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन व राखी बनविणे स्पर्धा हा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





















