Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा तडाखा; बेदाणे शेडचे मोठे नुकसान, वीज पडून गाय दगावली

तरुण भारतbyतरुण भारत
April 2, 2026
in editor
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कमंगळवेढा – तालुक्यातील नंदेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसासोबत आलेल्या गारपीट, विजांच्या कडकडाटामुळे द्राक्ष उत्पादक, बेदाणे शेड धारक आणि पशुपालक शेतकऱ्यांचे गणित कोलमडून पडले आहे.

गुरुवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊ लागला. दिवसभर कडक उन्हाचा चटका बसल्यानंतर अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची पावसाची चाहूल लागली. दरम्यान, अल्पावधीतच विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच मुसळधार पावसाने नंदेश्वर, परिसरातील शिवार, द्राक्ष मळे, बेदाणे शेड, जनावरांची गोठी आणि अनेक घरांच्या पत्र्यांवर हल्ला चढवला.

या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका नंदेश्वर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे. याठिकाणी गेल्या काही वर्षांपासून द्राक्षाचे उत्पादन व त्यावर प्रक्रिया करून बेदाणे उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. द्राक्ष उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या तसेच बेदाणे वाळविण्यासाठी उभारलेल्या अनेक शेडच्या बांधकामावर जोरदार पावसासह वाऱ्याने तडाखा दिला.

अनेक शेडचे पत्रे उडून गेले, तर काही शेडची लोखंडी स्ट्रक्चर वाकडी झाली. काही ठिकाणी प्लास्टिक शेड फाटून उघडी पडली. या सर्व प्रकारामुळे बेदाण्याचे चालू उत्पादन, सुकविण्यासाठी ठेवलेले द्राक्ष, तयार होण्याच्या अवस्थेतील बेदाणे, तसेच आधीच साठवलेला माल या सर्वांवर पावसाचे पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले.

काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून, तर काहींनी पारंपरिक सोन्या-नाण्या विकून बेदाणे शेड उभारले होते. या शेडवरच संपूर्ण आर्थिक गणित उभे असताना पावसाने ते गणित मोडून काढले. “दरवर्षी व्यवस्थित हंगाम गेला तर कर्ज हळूहळू फेडता येते, पण यंदाचा हा पाऊस आम्हाला उद्ध्वस्त करणार आहे,” असे भावना व्यक्त करणारे स्वर शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले.

अवकाळी पावसामुळे केवळ बेदाणे शेडचेच नव्हे, तर अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला अशी विविध पिके थेट पाण्याखाली गेली. काही शिवारात पाणी साचून राहिल्याने पिकांच्या मुळांवर ताण आला असून पुढील दोन–तीन दिवस ऊन न लागल्यास या पिकांची वाढ पूर्णपणे खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याच दरम्यान नंदेश्वर येथील शेतकरी धोंडीराम गरंडे यांच्या गायीचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सायंकाळच्या सुमारास जनावरांना चारा टाकून ते घराकडे परतले असता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात रानात उभी असलेल्या त्यांच्या गायीवर वीज कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे गरंडे कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असलेली गाय हातची गेल्याने घरच्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. “हीच गाय रोजच्या दुधावर घर चालवणारी होती. मुलांच्या शिक्षणापासून घरखर्चापर्यंत सर्व काही या गायीवर अवलंबून होते,” असे सांगताना गरंडे कुटुंबीयांचे डोळे पाणावले.

नंदेश्वर परिसरातील या संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळताच पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ नंदेश्वरला धाव घेतली. त्यांनी प्रथम गरंडे यांच्या घरास भेट देत गायीच्या मृत्यूची पाहणी केली, कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि प्रशासनाकडून होणाऱ्या शासकीय मदतीबाबत त्यांना माहिती दिली.

त्यानंतर आमदार आवताडे यांनी अवकाळी पावसाने बाधित झालेल्या विविध शिवारांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. बेदाणे शेडचे उडालेले पत्रे, फाटलेले प्लास्टिक, पावसाने ओलीचिंब झालेली द्राक्षे, पडून गेलेली झाडे, पाण्याखाली गेलेले मळे, चिखलाने भरलेले मार्ग – या सर्व दृश्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल किती मोठे आहेत, याची कल्पना येत होती.

पाहणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आमदारांना आपली व्यथा मांडली. “साहेब, कर्ज काढून शेड उभारली, माल तयार होण्याच्या आतच पावसाने सर्व काही खराब केले. आता कर्ज कसे फेडायचे? मुलांचे शिक्षण, घरखर्च, मजूरांचे पैसे – सगळेच अडचणीत आले आहे,” अशी हाक अनेक जणांनी मारली.

यावेळी प्रांत अधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, मंगळवेढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष येताळा भगत, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम, मंडल कृषी अधिकारी बालाजी टेकाळे, कृषी पर्यवेक्षक ढाने, कृषी विभागाचे सहाय्यक दीपक कोकरे, तलाठी महेश राऊत, पशुधन विकास अधिकारी कुंभार आदी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार समाधान आवताडे म्हणाले, “नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असा पाऊस होणे म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला मोठा दणका आहे. शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

पुढे ते म्हणाले, “प्रशासनाने सर्वप्रथम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर हाती घ्यावेत. पिकांचे, घरांचे, बेदाणे शेडचे, तसेच वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचेही सर्व संबंधित कागदपत्रांसह पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घ्यावी.”

आमदार आवताडे यांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “नुकसानग्रस्त भागाचा सर्वंकष अहवाल तयार करून तो तात्काळ जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे पाठवावा. पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व बाधित शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत, विमा निधी, तसेच आवश्यक त्या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.”

पावसामुळे नुकसान झालेल्या जनावरांच्या संदर्भात पशुधन विकास अधिकाऱ्यांना त्यांनी स्वतंत्रपणे सूचना केल्या. मृत गायीबाबत शासकीय निकषांनुसार भरपाई देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्वरेने पूर्ण करून प्रकरण शासकीय स्तरावर पाठविण्याचा आदेश दिला. यासोबतच, इतर कोणत्याही शेतकऱ्याच्या जनावरांच्या संदर्भात अशा घटना घडल्या असतील तर त्या तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची होणार नाही, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आमदार आवताडे यांनी केले. “शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.

पाहणी दौऱ्यानंतर स्थानिक शेतकरी व नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या व मागण्या मांडल्या. विशेषतः पीक विमा योजनांमधील त्रुटी, पूर्वीच्या हंगामातील प्रलंबित भरपाई, महसूल विभागाकडून पंचनामा करण्यातील ढिलाई, मदतीचे प्रमाण अपुरे असणे इत्यादी मुद्यांवर शेतकऱ्यांनी प्रशासनास जाब विचारला.

उत्तरादाखल प्रांत अधिकारी माळी यांनी सांगितले की, “या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आम्ही तातडीने तयार करू. सर्व महसूल मंडळांतून पंचनाम्यांचे पथक शिवारात पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी प्रतिनिधी, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्या संपर्कात राहावे. दस्तऐवज पूर्ण असतील तर नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार होण्यास विलंब होणार नाही.”

तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी द्राक्ष व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या तांत्रिक दृष्टीने होणाऱ्या परिणामांविषयी मार्गदर्शन केले. पावसानंतर झाडांवरील रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तातडीने कोणती फवारणी, कोणते संरक्षणात्मक उपाय करावेत, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर आणि अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांना धीर देत शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “या भागातील शेतकरी आधीच दुष्काळ, अल्प पाऊस, बाजारभावातील चढ-उतार अशा अनेक संकटांशी सामना करत आहेत. त्यातच अवकाळी पावसाने त्यांच्या संकटात भर घातली आहे. त्यामुळे यावेळी शासनाने मदत जास्त दराने आणि तातडीने द्यावी,” अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

नंदेश्वर परिसरात अवकाळी पावसामुळे झालेले एकूण नुकसान नेमके किती, याचा अधिकृत अंदाज अद्याप समोर आलेला नसला तरी प्राथमिक पातळीवर द्राक्ष आणि बेदाणे उत्पादनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच उभ्या पिकांचे, घरांचे, जनावरांचे आणि अन्य कृषी साधनांचे नुकसान मिळून हा आकडा आणखी वाढू शकतो, असेही स्थानिक शेतकरी संघटनांनी सांगितले.

“दरवर्षी कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट… शेवटी सर्व संकटे शेतकऱ्यांवरच कोसळतात. नुसत्या घोषणा करून आता भागणार नाही, तर नुकसानग्रस्तांना रोखीने आणि तातडीने दिलासा द्यावा,” अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नंदेश्वर आणि परिसरातील शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. प्रशासनाने वेगाने पंचनामे करून मदत जाहीर केली, तर येणाऱ्या हंगामात शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 49
Previous Post

उमरड येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

Next Post

मोडनिंब येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मोडनिंब येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

मोडनिंब येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207747

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!